शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:35 IST

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी ...

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी येऊन आपल्या गावाला धडे द्यावेत हे कुणालाही आवडणार नाही. त्यातच जिल्हा परिषदसारखी मजबूत यंत्रणा अशा त्रयस्थाच्या (एजंट) माध्यमातून ग्रामपंचायतींना स्वच्छ करणार असेल तर मग अशा व्यवस्थेला आपोआपच मान्यताही मिळते. महाराष्टÑात लोकसहभागातून स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करणाºया हिरवेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या गावांनी राज्यात आपला ठसा उमटविला आहे. पाटोदा गावाची महती, तर थेट राष्टÑपतींपर्यंत पोहचली आहे. या गावांंच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील जवळपास २५ तरी गावे अशी आहेत की त्यांनी लोकसहभागूत गावाचा शाश्वत विकास केला आहे. माणसाला माणसे जोडून विकासाची नवी परिभाषा निर्माण केलेली आहे. राज्यातच अशा गावांचा आदर्श असताना जिल्हा परिषद मात्र गावात राबविण्यात येणाºया कोणत्याही योजनेसाठी ‘थर्ड पार्टी’ एजंटच्या भरवशावर का आहे याचा मात्र उलगडा होत नाही. पाणी स्वच्छ असो की शौचालय, आरोग्य यंत्रणा असोत की शिक्षण यामध्ये एखासी संस्था काय सुचविणार. वर्षानुवर्ष जिल्हा परिषद योजना रोबविण्याबरोबरच तळागाळापर्यंत पोहचलेली असताना नव्याने या एजंट म्हणून कंपन्या कुठून उगवल्या हे मात्र उमगत नाही.गोदाकाठावरील गावे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्याबरोबरच गोदावरीही कशी प्रदूषणमुक्त राहिली याचे नियोजन खासगी कंपन्यांकडे सोपविले जाणार आहे म्हणे. म्हणजे वर्षानुवर्ष जिल्हा परिषदा नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच गावाच्या विकासाठी नियोजनात्मक आणि योजनात्मक काम करीत असताना अलीकडे मात्र खासगी कंपन्या अशा प्रकारची भूमिका बजावत आहेत. म्हणजे गावाची पाहणी करून या कंपन्या ठरविणार की गावाच्या विकासासाठी काय करावे आणि किती निधी लागेल. खरेतर खात्यातच इतकी अनुभवी माणसे आणि जिल्ह्याची स्वतंत्र यंत्रणा असतांना कुण्या तिसºयाने का म्हणून विकासाची वाट दाखवावी. खरेतर कागदोपत्री कतीही सुंदर रांगोळ्या काढल्या तरी प्रत्यक्षात तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक रचनेवर विकासाचा बराचसा भाग अवलंबून असतो. केवळ ठोकताळा येथे लागू पडत नाही. तसे असते तर राज्यातील आदर्श गावे ही एजंटांच्या कामगिरीवरच ठरली असती.लोकसहभागातून लोकचळवळी उभ्या राहिल्या आहेत. यातून अनेक कामे घडून आली आहेत. नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्षातील कामांनी अनेक गावांनी देशात आदर्श निर्माण केला आहे. गावकºयांनी ठरविले तर काहीही होऊ शकते. ‘काय करील ‘राव’, जे करील गाव’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते ते उगाच नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्था काहीही करू शकत नाही. लोकभावना आणि लोकांची मानसिकता तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही मध्यस्थाविनालोकसहभागीतून अशाप्रकारचे रचनात्मक काम होऊ शकते हे महाराष्टÑाने पाण्याच्या मोहिमेतून पाहिले आहेच.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद