शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:35 IST

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी ...

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी येऊन आपल्या गावाला धडे द्यावेत हे कुणालाही आवडणार नाही. त्यातच जिल्हा परिषदसारखी मजबूत यंत्रणा अशा त्रयस्थाच्या (एजंट) माध्यमातून ग्रामपंचायतींना स्वच्छ करणार असेल तर मग अशा व्यवस्थेला आपोआपच मान्यताही मिळते. महाराष्टÑात लोकसहभागातून स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करणाºया हिरवेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या गावांनी राज्यात आपला ठसा उमटविला आहे. पाटोदा गावाची महती, तर थेट राष्टÑपतींपर्यंत पोहचली आहे. या गावांंच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील जवळपास २५ तरी गावे अशी आहेत की त्यांनी लोकसहभागूत गावाचा शाश्वत विकास केला आहे. माणसाला माणसे जोडून विकासाची नवी परिभाषा निर्माण केलेली आहे. राज्यातच अशा गावांचा आदर्श असताना जिल्हा परिषद मात्र गावात राबविण्यात येणाºया कोणत्याही योजनेसाठी ‘थर्ड पार्टी’ एजंटच्या भरवशावर का आहे याचा मात्र उलगडा होत नाही. पाणी स्वच्छ असो की शौचालय, आरोग्य यंत्रणा असोत की शिक्षण यामध्ये एखासी संस्था काय सुचविणार. वर्षानुवर्ष जिल्हा परिषद योजना रोबविण्याबरोबरच तळागाळापर्यंत पोहचलेली असताना नव्याने या एजंट म्हणून कंपन्या कुठून उगवल्या हे मात्र उमगत नाही.गोदाकाठावरील गावे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्याबरोबरच गोदावरीही कशी प्रदूषणमुक्त राहिली याचे नियोजन खासगी कंपन्यांकडे सोपविले जाणार आहे म्हणे. म्हणजे वर्षानुवर्ष जिल्हा परिषदा नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच गावाच्या विकासाठी नियोजनात्मक आणि योजनात्मक काम करीत असताना अलीकडे मात्र खासगी कंपन्या अशा प्रकारची भूमिका बजावत आहेत. म्हणजे गावाची पाहणी करून या कंपन्या ठरविणार की गावाच्या विकासासाठी काय करावे आणि किती निधी लागेल. खरेतर खात्यातच इतकी अनुभवी माणसे आणि जिल्ह्याची स्वतंत्र यंत्रणा असतांना कुण्या तिसºयाने का म्हणून विकासाची वाट दाखवावी. खरेतर कागदोपत्री कतीही सुंदर रांगोळ्या काढल्या तरी प्रत्यक्षात तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक रचनेवर विकासाचा बराचसा भाग अवलंबून असतो. केवळ ठोकताळा येथे लागू पडत नाही. तसे असते तर राज्यातील आदर्श गावे ही एजंटांच्या कामगिरीवरच ठरली असती.लोकसहभागातून लोकचळवळी उभ्या राहिल्या आहेत. यातून अनेक कामे घडून आली आहेत. नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्षातील कामांनी अनेक गावांनी देशात आदर्श निर्माण केला आहे. गावकºयांनी ठरविले तर काहीही होऊ शकते. ‘काय करील ‘राव’, जे करील गाव’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते ते उगाच नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्था काहीही करू शकत नाही. लोकभावना आणि लोकांची मानसिकता तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही मध्यस्थाविनालोकसहभागीतून अशाप्रकारचे रचनात्मक काम होऊ शकते हे महाराष्टÑाने पाण्याच्या मोहिमेतून पाहिले आहेच.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद