शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

स्वच्छता मोहिमेतही ‘थर्ड पार्टी’ हवी कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:35 IST

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी ...

नाशिक : सांडपाणी नियोजन, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, पाणी स्वच्छता आणि आरोग्य यांचा समन्वय साधून गावाला स्वच्छ करण्यासाठी तिसऱ्याच कुणीतरी येऊन आपल्या गावाला धडे द्यावेत हे कुणालाही आवडणार नाही. त्यातच जिल्हा परिषदसारखी मजबूत यंत्रणा अशा त्रयस्थाच्या (एजंट) माध्यमातून ग्रामपंचायतींना स्वच्छ करणार असेल तर मग अशा व्यवस्थेला आपोआपच मान्यताही मिळते. महाराष्टÑात लोकसहभागातून स्वच्छ आणि सुंदर गाव निर्माण करणाºया हिरवेबाजार, राळेगणसिद्धी आणि औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या गावांनी राज्यात आपला ठसा उमटविला आहे. पाटोदा गावाची महती, तर थेट राष्टÑपतींपर्यंत पोहचली आहे. या गावांंच्या पावलावर पाऊल ठेवत राज्यातील जवळपास २५ तरी गावे अशी आहेत की त्यांनी लोकसहभागूत गावाचा शाश्वत विकास केला आहे. माणसाला माणसे जोडून विकासाची नवी परिभाषा निर्माण केलेली आहे. राज्यातच अशा गावांचा आदर्श असताना जिल्हा परिषद मात्र गावात राबविण्यात येणाºया कोणत्याही योजनेसाठी ‘थर्ड पार्टी’ एजंटच्या भरवशावर का आहे याचा मात्र उलगडा होत नाही. पाणी स्वच्छ असो की शौचालय, आरोग्य यंत्रणा असोत की शिक्षण यामध्ये एखासी संस्था काय सुचविणार. वर्षानुवर्ष जिल्हा परिषद योजना रोबविण्याबरोबरच तळागाळापर्यंत पोहचलेली असताना नव्याने या एजंट म्हणून कंपन्या कुठून उगवल्या हे मात्र उमगत नाही.गोदाकाठावरील गावे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्याबरोबरच गोदावरीही कशी प्रदूषणमुक्त राहिली याचे नियोजन खासगी कंपन्यांकडे सोपविले जाणार आहे म्हणे. म्हणजे वर्षानुवर्ष जिल्हा परिषदा नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबरच गावाच्या विकासाठी नियोजनात्मक आणि योजनात्मक काम करीत असताना अलीकडे मात्र खासगी कंपन्या अशा प्रकारची भूमिका बजावत आहेत. म्हणजे गावाची पाहणी करून या कंपन्या ठरविणार की गावाच्या विकासासाठी काय करावे आणि किती निधी लागेल. खरेतर खात्यातच इतकी अनुभवी माणसे आणि जिल्ह्याची स्वतंत्र यंत्रणा असतांना कुण्या तिसºयाने का म्हणून विकासाची वाट दाखवावी. खरेतर कागदोपत्री कतीही सुंदर रांगोळ्या काढल्या तरी प्रत्यक्षात तेथील भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक रचनेवर विकासाचा बराचसा भाग अवलंबून असतो. केवळ ठोकताळा येथे लागू पडत नाही. तसे असते तर राज्यातील आदर्श गावे ही एजंटांच्या कामगिरीवरच ठरली असती.लोकसहभागातून लोकचळवळी उभ्या राहिल्या आहेत. यातून अनेक कामे घडून आली आहेत. नियोजन करण्यापेक्षा प्रत्यक्षातील कामांनी अनेक गावांनी देशात आदर्श निर्माण केला आहे. गावकºयांनी ठरविले तर काहीही होऊ शकते. ‘काय करील ‘राव’, जे करील गाव’ असे ग्रामीण भागात म्हटले जाते ते उगाच नाही. एखादी व्यक्ती किंवा संस्था काहीही करू शकत नाही. लोकभावना आणि लोकांची मानसिकता तितकीच महत्त्वाची असते. कोणत्याही मध्यस्थाविनालोकसहभागीतून अशाप्रकारचे रचनात्मक काम होऊ शकते हे महाराष्टÑाने पाण्याच्या मोहिमेतून पाहिले आहेच.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद