शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

कोमजलेला ‘बालहक्क दिन’ (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 19:05 IST

‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा ...

‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा दिवस. संयुक्त राष्टÑसंघाने २० नोव्हेंबर १९८९ रोजी बालहक्क संहिता स्वीकारली आणि बालकांचे हक्क तसेच सुरक्षा याविषयीची जाणीव जागृती करण्यासाठी १९० देशांनी बालकांचे हक्क मंजूर करण्याच्या मसुद्याला मान्यता दिली. २० नोव्हेंबर उलटून दोन दिवस झाले आहेत. समाज आणि प्रशासन अशा दोन्ही पातळ्यांवर शहरात मात्र बालहक्कांच्या कार्यक्रमांची कुठेही जाणीव जागृत होताना दिसली नाही. खरेतर १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत बालहक्कासाठी सप्ताहाच साजरा करण्याचे संयुक्त राष्टÑसंघाचे संकेत आहेत. परंतु बालहक्काविषयी कुणाला काहीहीएक देणे-घेणे नसावे असेच शहरातील वातावरण राहिले. बालकांच्या त्यांच्या हक्कांपर्यंत पोहोचविण्यासाठीचा कोणताही प्रशासकीय आणि सामाजिक कार्यक्रम शहरात होऊ शकला नाही. शहराच्या कानाकोपऱ्यास एखादा कार्यक्रम झाला असेल त्याचेही समर्थन करता येणारे नाही. जागृती कार्यक्रम हे कोणत्या कोनाड्यात घेऊन उपयोगाचे होणार नाही याचीदेखील संबंधितांना समज द्यावी लागणार असेल तर बालकांना हक्क प्रदान करण्याच्या प्रवाहात असा छोटा विचार कितपत टिकणार हाही मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. खरेतर बाल हक्काच्या दिवशी तरी निदान झोपडपट्टी, सिग्नलवरील मुलांच्या हक्काची चर्चा होईल, असे वाटले होते. परंतु शहरात असा कुठलाच सोहळा होताना दिसला नाही.बालहक्क दिनानिमित्ताने दफ्तरविना शाळा, बालसभा, हक्क आणि अधिकाराचे मार्गदर्शन, आनंददायी खेळ, छंद स्पर्धा, शाळा परिसरातील धोक्याच्या जागा दूर करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा, मुलांच्या हक्क आणि संरक्षणावर चर्चा, बाल हक्काबाबतच्या स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा , पोस्टर बनविणे, चित्र काढणे असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे किंबहूना १४ ते २० नोव्हेंबर या सप्ताहात असे उपक्रम घ्यावेत असे संयुक्त राष्टÑसंघाचे निर्देश आहेत. मात्र एकूणच संवेदना हरविलेले समाजमन आणि प्रशासकीय उदासीनता यात ‘बालहक्कदिन‘ कोमजून गेला असेच म्हणावे लागेल.खरेतर बालहक्काच्या मुद्दाला मान्यता देताना बालहक्काच्या जाणिवांची मोठी यादी अनेक देशांनी मान्य केलेली आहे. परंतु यंत्रणाच उदासीन असेल तर बालहक्काची जनजागृती होणारच नाही. असेच काहीसे शहरात घडले. शहरात कुठेही मुलांचे आरोग्य, शिक्षण, पोषण आहार, याविषयीचे कार्यक्रम, बालविवाह, बालमजूर, लैंगिक शोषणाविरुद्धचा आवाज उठला नाही. अन्य दिवशी बालकांच्या हक्काची पायमल्ली होत असतेच ‘बालहक्क दिनी’देखील तेच घडून गेले. बालकेहक्कापासून दुर्लक्षितच राहिली.

टॅग्स :Nashikनाशिकchildren's dayबालदिन