शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या औष्णिक केंद्रातील वीज निर्मिती घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:27 IST

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे ...

ठळक मुद्देकोळशाची टंचाई ; केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असून, कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ठेवला जात आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी उपलब्ध होणाºया कोळशाच्या प्रमाणावर वीज निर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे. वास्तविक औष्णिक केंद्रांकडे सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक ठेवणे अपेक्षित असताना या केंद्रांकडे केवळ तीन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहत असून, दोन दिवसांत हा कोळसाही संपत असल्याने तिसºया दिवसाची चिंता मुख्य अभियंत्यांना असते.नाशिकमधील एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच स्टॉक मेन्टेन केला जात आहे. उपलब्ध कोळशाची मर्यादा लक्षात घेता २१० मेगावॅटच्या दोन संचांमधून एकूण १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण केली जात आहे. तिसरा २१० मेगावॅटचा संच सध्या वार्षिक देखभाल दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॅटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. संच चालविण्यासाठी प्रतिदिन कोळशाची मागणी नोंदविली जाते, परंतु मुख्य कार्यालयाकडून कोणतीही हमी दिली जात नसल्याने असलेल्या कोळशाचा मर्यादित वापर करून वीज निर्मिती करावी लागत आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, दोन्ही संच प्रत्येकी २१० मेगावॅट निर्मिती करतात. पुरेसा कोळसा मिळाला तर आणखी काही मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल प्रसंगी २१० चे दोन्ही संच पूर्ण क्षमतेचे चालविलेही जाऊ शकतात. मात्र कोळशामुळे दोन्ही संच मिळून केवळ १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण करीत आहेत.