शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

नाशिकच्या औष्णिक केंद्रातील वीज निर्मिती घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:27 IST

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे ...

ठळक मुद्देकोळशाची टंचाई ; केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असून, कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ठेवला जात आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी उपलब्ध होणाºया कोळशाच्या प्रमाणावर वीज निर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे. वास्तविक औष्णिक केंद्रांकडे सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक ठेवणे अपेक्षित असताना या केंद्रांकडे केवळ तीन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहत असून, दोन दिवसांत हा कोळसाही संपत असल्याने तिसºया दिवसाची चिंता मुख्य अभियंत्यांना असते.नाशिकमधील एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच स्टॉक मेन्टेन केला जात आहे. उपलब्ध कोळशाची मर्यादा लक्षात घेता २१० मेगावॅटच्या दोन संचांमधून एकूण १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण केली जात आहे. तिसरा २१० मेगावॅटचा संच सध्या वार्षिक देखभाल दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॅटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. संच चालविण्यासाठी प्रतिदिन कोळशाची मागणी नोंदविली जाते, परंतु मुख्य कार्यालयाकडून कोणतीही हमी दिली जात नसल्याने असलेल्या कोळशाचा मर्यादित वापर करून वीज निर्मिती करावी लागत आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, दोन्ही संच प्रत्येकी २१० मेगावॅट निर्मिती करतात. पुरेसा कोळसा मिळाला तर आणखी काही मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल प्रसंगी २१० चे दोन्ही संच पूर्ण क्षमतेचे चालविलेही जाऊ शकतात. मात्र कोळशामुळे दोन्ही संच मिळून केवळ १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण करीत आहेत.