शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!

By अझहर शेख | Updated: October 10, 2024 01:32 IST

टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार टाटा यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते.

अझहर शेख, नाशिक : पद्मविभूषण जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची शालिनता आणि साधेपणा सात वर्षांपूर्वी नाशिकने प्रथमच अनुभवला होता. मुंबईकडून येताना नाशिकच्या वेशीवर असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानात (बॉटनिकल गार्डन) टाटा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत ४५ मिनिटांहून जास्त वेळ घालवला होता. त्यावेळी ते नाशिक पुण्यभूमीत पहिल्यांदाच आले होते. टाटा ट्रस्टच्या साहाय्याने महापालिका प्रशासनाने नूतनीकरण केलेले हे उद्यान बघून हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, असे गौरवोद्गार त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे काढले होते.

नाशिक नगरपालिकेत मनसेची सत्ता असताना वनविभागाच्या ताब्यात असलेले नेहरू वनोद्यानाचा विकास ठाकरे यांनी करण्याचा संकल्प सोडला होता. त्यानंतर वनविकास महामंडळाकडे वनोद्यान हस्तांतरण करण्यात येऊन वन मंत्रालयाने नूतनीकरणाला ग्रीन सिग्नल दिला होता. यासाठी महापालिका प्रशासनाला टाटा ट्रस्टकडून आर्थिक सहकार्य करण्यात आले होते. आजदेखील प्रवेशद्वारावर टाटा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला फलक येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. 

३० जानेवारी २०१७ साली चार्टड विमानाने मुंबईहून रतन टाटा या वनोद्यानाचे लोकार्पण करण्यासाठी पहिल्यांदा नाशिकला आले होते. सोमवारी सकाळी नऊ नाशिकला पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी ओझर विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. तेथून ते त्यांच्यासोबत मुंबई-आग्रा महामार्गावरील त्रिरश्मी लेणी (बौद्ध लेणी) डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वनोद्यानात आले. फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक असे भव्य प्रवेशद्वार बघून टाटा प्रचंड आनंदी झाले होते. इकोफ्रेंडली कारमधून त्यांनी ठाकरे यांच्यासोबत संपूर्ण वनोद्यानात फेरफटका लगावला होता. 

यावेळी त्यांनी उद्यानाची व येथील वृक्षराजीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी टाटा म्हणाले होते, हे गार्डन व येथील निसर्गाने मला प्रभावित केले. हा इनोव्हेटिव्ह प्रकल्प असून अशा चांगल्या प्रकल्पांची भारताच्या व महाराष्ट्राच्या शहरांना गरज आहे. ही त्यांची नाशिक भेट पहिली आणि अखेरची ठरली. नाशिककरांनी त्यांना बघण्यासाठी यावेळी वनोद्यानात प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्या या भेटीने एका जगप्रसिद्ध उद्योगपतीचा साधेपणा हा नाशिककरांनी बघितला अन् तो अविस्मरणीय असाच ठरला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatan Tataरतन टाटा