शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

नाशिककरांवर साडेचार कोटींचा फास, म्हणे पर्वणी झाली झक्कास !

By admin | Updated: October 1, 2015 00:03 IST

ठेकेदाराच्या बल्ली बॅरिकेडिंगवर पोलीस खात्याचं चांगभलं

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीला कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून शहरातील प्रत्येक रस्त्याच्या गळ्याला फास लावणाऱ्या पोलिसांच्या बल्ली बॅरिकेडिंगमुळे पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरविली, परिणामी भाविक न आल्याने संपूर्ण यंत्रणेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले, दुसऱ्या पर्वणीला मात्र हेच बल्ली बॅरिकेडिंग कमी करून रस्ते मोकळे करावे लागल्याची नामुष्की पोलीस खात्यावर ओढवली असताना साडेचार कोटी रुपयांचा बल्ली बॅरिकेडिंगचा ठेका कोणी व कशासाठी दिला हा प्रश्न कुंभमेळ्याच्या पर्वण्या आटोपल्यावरही कायम आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून प्रत्येक पर्वणीला ८० लाख ते एक कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज बांधून या भाविकांची गर्दी एकाच वेळी शहरात व विशेषत: रामकुंड, साधुग्राम परिसरात शिरून चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलिसांनी यंदाच्या सिंहस्थात पहिल्यांदाच शहरातील रस्ते बल्ली बॅरिकेडिंगने आवळण्याचा निर्णय घेतला. रामकुंडाकडे जाणाऱ्या-येणाऱ्या भाविकांच्या मार्गाला येऊन मिळणाऱ्या उपरस्त्यांची त्यासाठी नाकाबंदी करून नाशिककरांनाच नजरकैदेत ठेवण्यासाठी जवळपास ४० किलोमीटर अंतराचे बल्ली बॅरिकेडिंग करण्यात आले व त्यासाठी मुंबईच्या आर. ई. इन्फ्रा या कंपनीला ठेका देण्यात आला. साडेचार कोटी रुपयांच्या या ठेक्यात पोलीस खात्यातील कोणाचा ‘इंटरेस्ट’ होता याची आता जाहीर चर्चा होत असली तरी, ज्या बल्ली बॅरिकेडिंगमुळे शहरवासीयांना तुरुंगवासाचा अनुभव घ्यावा लागला, बारा वर्षांनी येणाऱ्या पर्वणीच्या मुहूर्ताकडेही पाठ फिरवावी लागली त्या बॅरिकेडिंगने काय साध्य केले? हा प्रश्नही अनुत्तरित राहिला. बारा वर्षांपूर्वीच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वण्यांना ५० लाखांच्या पुढेच भाविकांनी हजेरी लावली होती, तेव्हा करण्यात आली नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची अडवणूक यंदाच्या कुंभमेळ्यात करण्यात आल्याने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बल्ली बॅरिकेडिंग केली की, बल्ली बॅरिकेडिंगसाठी भाविकांना अडविण्यात आले याचा उलगडा पोलिस खात्यातील धुरीण करू शकले नाहीत; मात्र नागरिकांनी व भाविकांनीच अशी परिस्थिती निर्माण केली की, पोलिसांना आपणहूनच बल्ली बॅरिकेडिंगचा अडथळा दूर करावा लागला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून बल्ली बॅरिकेडिंगचा जाहीर निविदेद्वारे ठेका देण्यात आलेला असला तरी, असा ठेका देताना एखाद्या विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून त्यातील नियम, अटी व शर्ती घालण्यात आल्या की काय अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली, परिणामी शहरात वर्षानुवर्षे मंडप व्यवसाय करणारेही निविदेच्या शर्यतीत टिकू शकलेले नाहीत, त्यामुळे शहरातच रोजगार व्यवसाय वृद्धीची संधीही गमवावी लागली. कुंभमेळ्याची पहिली पर्वणी गर्दीच्या पातळीवर फोल ठरल्यानंतर या पर्वणीला अपेक्षित भाविक येणार नव्हतेच असा पवित्रा नंतरच्या काळात पोलीस खात्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेतला; मात्र त्याच वेळी बल्ली बॅरिकेडिंग भाविकांच्या सुरक्षिततेसाठी किती आवश्यक होती हे पटवून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला तर त्याचबरोबर या बल्ली बॅरिकेडिंगमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाल्याची कबुलीही देण्यात आली. बल्ली बॅरिकेडिंगमुळे शहर वेठीस धरले गेल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून पालक मंत्र्यासमक्ष करण्यात आल्यावर त्यात बदल करण्याची भूमिका पोलीस यंत्रणेने घेतली म्हणजेच एक तर पहिल्या पर्वणीचे नियोजन चुकले असेल किंवा या पर्वणीला लाखोंच्या संख्येने भाविक येणार नसल्याचे माहीत असूनही जे काही येणार होते, त्यांची अडवणूक करण्यासाठीच बल्ली बॅरिकेडिंग केली होती हे स्पष्ट होते. पहिल्या पर्वणीला भाविकांच्या कमी गर्दीत रस्ते आवळणाऱ्या पोलीस यंत्रणेने दुसऱ्या पर्वणीला दुपटीने भाविक येऊनही रस्ते मोकळे ठेवले व कोणतीही दुर्घटना न घडता पर्वणी पार पडल्याने बल्ली बॅरिकेडिंगची खरोखरच आवश्यकता होती काय असा प्रश्न पडल्यावाचून राहावत नाही. दोन पर्वण्यांची ही तऱ्हा असताना तिसऱ्या पर्वणीला तर मुसळधार पावसाने पोलीस यंत्रणेचेच काम हलके केले म्हटल्यावर बल्ली बॅरिकेडिंगची गरजच काय ?