शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या बांबू राख्यांना नाशिककरांची पसंती

By admin | Updated: September 4, 2016 00:47 IST

तिसरे वर्ष : विद्यार्थ्यांचा ‘प्रोजेक्ट बंधन

 

’नाशिक : मेळघाटमधील दुर्गम आदिवासींच्या हातांना अधिकाधिक रोजगार मिळावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मविप्रचे एमबीएचे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. संपूर्ण बांबू केंद्रात आदिवासींनी बनविलेल्या राख्यांची नाशिकच्या बाजारपेठेत विक्री करत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न या केंद्राला विद्यार्थ्यांनी यावर्षी मिळवून दिले.ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही बांबूंच्या पर्यावरणूपरक राख्या नाशिकच्या बाजारपेठेत विकल्या. एमबीए विभागाचे विभागप्रमुख डी. टी. खैरनार, डॉ. एस. आर. पाचोरकर यांनी ‘प्रोजेक्ट बंधन’ हातात घेतले आहे. संस्थेचे तिसरे वर्ष असून, यावर्षी विद्यार्थ्यांनी शहरातील मेनरोड, गंगाघाट, सोमेश्वर मंदिर, कपालेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, एमजीरोड, सिटी सेंटर मॉल, दहीपूल आदि परिसरात स्टॉल्स लावून बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्यांच्या विक्रीचा ‘सोशल टास्क’ पूर्ण केला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, विपणनशास्त्र आदि बाबींचा विकास व्हावा आणि आदिवासींच्या हस्तकलेला अधिकाधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने प्रोजेक्ट बंधन राबविले जात आहे, अशी माहिती खैरनार यांनी यावेळी दिली. वेणू शिल्पी औद्योगिक संस्थेच्या संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष निरुपमा देशपांडे यांना एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दोन लाख दोन हजार ४०२ रुपयांचा धनादेश संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तीन वर्षांमध्ये एकूण ४ लाख ७८ हजार रुपयांचे उत्पन्न विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आदिवासींना मिळवून दिले आहे.अनियमित रोजगारामुळे सातपुडा पर्वतरांगेचे अखेरचे टोक असलेले मेळघाट कुपोषित बालमृत्यूसाठी ओळखले जाते. मेळघाटची ही ओळख बदलण्यासाठी आदिवासींना कुशल कारागीर बनविण्याचा प्रयत्न २१ वर्षांपासून वेणू शिल्पी संस्था करत आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना किराणा मालाची यादीही लिहिता येणार नाही, इतक्या सुमार दर्जाचे शिक्षण आदिवासींना दिले जाते. नाशिकपासून सुरू झालेले ‘प्रोजेक्ट बंधन’ राज्यभर पोहचले याचा अभिमान असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)