शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काव्य, नृत्यरंगात रंगले नाशिककर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

नाशिक : कवी दिवंगत किशोर पाठक यांना काव्यरंगातून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजोबा आणि नात यांचे नाते किती ...

नाशिक : कवी दिवंगत किशोर पाठक यांना काव्यरंगातून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजोबा आणि नात यांचे नाते किती वेगळ्या पातळीवरचे असते त्याचा उलगडा करणाऱ्या त्यांच्या ‘नात’ या कवितेच्या सादरीकरणातून रसिकांना भावविभोर केले.

जनस्थान ग्रुपच्या वतीने आयोजित या काव्यमैफलीत वैविध्यपूर्ण विषयांना हात घालत नाशिककर कवींनी त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडविले. ‘श्वासापुरते येऊ जवळ, पेलेल तेवढाच सूर धरू, माती सुटेल एवढीच फक्त पंखांमध्ये हवा भरू’ या आनंद जोर्वेकर लिखित कवितेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर त्याची प्रचीती एकेका कविगणिक रसिकांना होत गेली. कोरोनाच्या काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही किती भयावह होती त्याचे चित्र उलगडणाऱ्या कवितांचे वाचन यावेळी करण्यात आले. मिलिंद गांधी, प्रकाश होळकर, राजू देसले, पंकज क्षेमकल्याणी, संजय चौधरी, प्रथमेश पाठक, सी. एल. कुलकर्णी, दत्ता पाटील, केशव कासार, कैलास पाटील या कवींच्या कविता व्यासपीठावर ज्यांनी वाचल्या, त्यांनी त्यांच्याही कविता यावेळी प्रस्तुत केल्या.

इन्फो

नृत्यरंगाची अनुभूती

शनिवारी शहरातील दिग्गज कथक, भरतनाट्यम नृत्यांगनांनी सादरीकरण करीत रसिकांना खिळवून ठेवले. त्यात नृत्यांगना सुमुखी अथनी यांनी ‘जानकी नाथ सहाय करे’ ही तुलसीदासांची रचना सादर केली. त्यानंतर ‘बसाे माेरे नैनन मे नंदला’ ही मीराबाईंची ब्रिजेश मिश्रा यांनी गायलेली रचना सादर करून वाहवा मिळविली. यासह ‘भजन बिनाही नाम बिना’ ही संत कबीर यांची रचनाही प्रस्तुत करून रसिकांना खिळवून ठेवले. त्यांना आशिष रानडे, नितीन पवार यांनी साथसंगत केली, तर ज्येष्ठ नृत्यांगना विद्याहरी देशपांडे यांनी बिंदादिन महाराज रचित ‘हे गाैरी रमण’ ही शिववंदना सादर केली. कीर्ती भवाळकर यांनी ‘मी गाईये गणपती जगवंदन’ हे गणेश स्तुतीपर भजन सादर करून लक्ष वेधले. या रचनेतून त्यांनी प्रस्तुत केलेल्या देवीच्या आराधनेलाही दाद मिळत हाेती. आदिती पानसे यांनी ‘वचन प्रण राजा दशरथ’ हा अभंग सादर केला. भरतनाट्यममधून पल्लवी जन्नावार यांनी ‘अच्युतम केशवम’ आणि ‘शिवतांडव’ सादर करीत विशेष लक्ष वेधले. शिल्पा देशमुख यांनी भीमसेन जाेशी यांच्या अभंगावरील नृत्यातून विविध पैलू उलगडले, तर ‘भूमी मंगल’ या गीतातून मंगलतेची कामना करणाऱ्या त्यांच्या नृत्यालाही कमेंट बाॅक्समध्ये दाद मिळाळी. कार्यक्रमाची निर्मिती अभय ओझरकर, विनाेद राठाेड यांची हाेती. विनायक रानडे, लक्ष्मण काेकणे यांचे त्याला सहकार्य लाभले.

फोटो

२६जनस्थान फोटो