शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दिव्यांग मतदारांची माहिती घेण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 18:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली ...

ठळक मुद्देनिवडणूक विभाग : शासकीय यंत्रणेसह संघटनांचाही सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारच्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना विशेष सुविधा देण्यात येणार असल्याने मतदान केंद्रनिहाय त्यांची माहिती एकत्रित करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागाकडून केले जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख इतकी आहे.मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील टक्का अपेक्षित नसल्याने विधानसभेत मतांचा टक्का वाढावा यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. निर्दोष यादी करण्यासाठी निवडणूक शाखेने मोठी मोहीम राबविली आणि सुमारे ५६ हजार दुबार आणि मयत नावे यादीतून काढून टाकली. तर नव्याने १९ हजारांपेक्षा अधिक नावे यादीत समाविष्ट झाली. जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार विधानसभेसाठी मतदान करणार आहेत.लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदानापासून वंचित राहणाऱ्या घटकांची मतदार म्हणून नोंद करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. विधानसभेच्या मतदार यादीतील स्त्री आणि पुरुष मतदारांप्रमाणेच तृतीय पंथियांचीदेखील नोंदणी करण्यात आली असून, जिल्ह्यात ३५ तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद अंतिम मतदार यादीत करण्यात आलेली आहे.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक