शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गुंडगिरीमुळे नाशिकरोडला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: January 22, 2017 00:08 IST

पोलीस हतबल : भाईगिरीचे प्राबल्य; दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीती

नाशिकरोड : नाशिकरोड परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंडगिरी, टोळीगिरीचे कंबरडे मोडण्यात पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सर्वसामान्य रहिवासी हतबल झाले आहेत़ त्यातच शेजवळ खून प्रकरणामुळे तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालल्याचे निदर्शनास आले असून, आगामी महापालिका निवडणुका भयमुक्त होणार का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे़ जेलरोड परिसराचा गेल्या काही वर्षांत ज्या झपाट्याने विकास झाला त्याचप्रमाणे या भागात गुंडगिरी, भाईगिरी, टोळीगिरीचे प्राबल्य वाढले आहे. राजकीय पक्षांनी गुंडापुंडांना आश्रय दिल्याने व मारामाऱ्या, हाणामाऱ्या झाल्या की राजकीय हस्तक्षेप वाढल्याने भाईगिरीमध्ये वाढ झाली आहे. गल्लीबोळांत, चौकाचौकांत युवकांचे टोळके उभे राहत असून, ‘भाई’च्या क्रेझमुळे १४-१५ वयोगटानंतरची मुले याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. केक कापावा याप्रमाणे जेलरोडचा परिसर प्रत्येक भाईचा एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. पूर्वी पोलिसांना बघितले तरी सर्व काही ठिकाणावर येत होते. मात्र विविध कारणांमुळे खाकीचा वचक कमी झाल्याने गुंडगिरीने चांगलेच तोंड वरती आले आहे.  दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त डी़ एस़ स्वामी, हेमराजसिंह राजपुत या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्याचा धाक निर्माण करत सगळेच वठणीवर आणले होते.