शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

नाशिकरोडला ‘उत्सव’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:46 IST

नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती.

नाशिकरोड : नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळेच येथील गणेशोत्सवदेखील तितका भव्य आणि नागरिकांना आकर्षित करणारा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाची भव्यता कमी झाली असून, बोटावर मोजण्याइतपतच मंडळांच्या बळावर गणेशोत्सवाची परंपरा टिकून आहे.अनेकविध कारणांमुळे उत्सवातील भव्यता कमी झाली असून, लोकसहभागही कमी झाला आहे. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय कारणेदेखील यामागे असल्याचे सांगितले जात असले तरी परंपरागत सण-उत्सवासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणारे कार्यकर्ते, नेतेच नसल्याने नाशिकरोडचा सांस्कृतिक वारसा कमी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे इंदिरानगरसारख्या भागात सांस्कृतिक चळवळ रुजत असताना जवळच्या नाशिकरोडमधून मात्र उत्सवाचे महत्त्वच कमी झाल्याचे चित्र आहे.नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास हद्दपार झाल्यासारखाच आहे. बोटावर मोजण्याइतपत पाच ते सात मंडळांनी ही परंपरा कशीबशी टिकवून धरली आहे. अंतर्गत राजकारण, नियम आणि कायद्याचा अडसर, पोलिसांची दंडुकेशाही घटलेली वर्गणी, आर्थिक अडचणी, लोकांचा कमी झालेला सहभाग या सर्वांचा परिणाम या उत्सवावर दिसून येत आहे.साधारणपणे दोन दशकांपूर्वी नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख होती. मंडळांमध्ये भव्यतेची स्पर्धा होती. धुमधडाक्यात उत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सवाची संख्या मोठी होती. परंतु कालांतराने या उत्सवाला घरघर लागली. अनेक विविध घटनांमुळे मंडळांची संख्या कमी होत गेली.उत्सवाला सार्वजनिक स्वरूप यावेसार्वजनिक उत्सवातून कमी होणारे कार्यकर्ते, नेत्यांचे झालेले दुर्लक्ष, पोलीस प्रशासनाचे नियम, महागडे देखावे, या कारणांमुळे उत्सवाला अधिकच उतरती कळा आली आहे. लोकांचा सहभाग आणि सार्वजनिक हितासाठी नेते, कार्यकर्त्यांनी उत्सव अधिक लोकाभिमुख केला तर सर्वसामान्यांचाही सहभाग वाढू शकतो.कार्यकर्त्यांचा राजकारणातील सक्रिय सहभाग वाढत गेला आणि सामाजिक सण उत्सवाची नाळ तुटत गेली. राजकारण आणि स्वहिताला महत्त्व प्राप्त झाल्याने सार्वजनिक मंडळे हळूहळू कमी झाली. ज्यांची इच्छा आहे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. निवडणुकीचा ज्वर वाढला तर उत्सवाला बहर येतो. इतरवेळी मात्र कुणीही मदतीला पुढे येत नसल्याचा अनुभव जुन्या कार्यकर्त्यांना येत आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिकNashik Floodनाशिक पूर