शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

नाशिकरोडला ‘उत्सव’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:46 IST

नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती.

नाशिकरोड : नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. त्यामुळेच येथील गणेशोत्सवदेखील तितका भव्य आणि नागरिकांना आकर्षित करणारा होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाची भव्यता कमी झाली असून, बोटावर मोजण्याइतपतच मंडळांच्या बळावर गणेशोत्सवाची परंपरा टिकून आहे.अनेकविध कारणांमुळे उत्सवातील भव्यता कमी झाली असून, लोकसहभागही कमी झाला आहे. सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय कारणेदेखील यामागे असल्याचे सांगितले जात असले तरी परंपरागत सण-उत्सवासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणारे कार्यकर्ते, नेतेच नसल्याने नाशिकरोडचा सांस्कृतिक वारसा कमी होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे इंदिरानगरसारख्या भागात सांस्कृतिक चळवळ रुजत असताना जवळच्या नाशिकरोडमधून मात्र उत्सवाचे महत्त्वच कमी झाल्याचे चित्र आहे.नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास हद्दपार झाल्यासारखाच आहे. बोटावर मोजण्याइतपत पाच ते सात मंडळांनी ही परंपरा कशीबशी टिकवून धरली आहे. अंतर्गत राजकारण, नियम आणि कायद्याचा अडसर, पोलिसांची दंडुकेशाही घटलेली वर्गणी, आर्थिक अडचणी, लोकांचा कमी झालेला सहभाग या सर्वांचा परिणाम या उत्सवावर दिसून येत आहे.साधारणपणे दोन दशकांपूर्वी नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची एक वेगळी ओळख होती. मंडळांमध्ये भव्यतेची स्पर्धा होती. धुमधडाक्यात उत्सव साजरा केला जात होता. गणेशोत्सवाची संख्या मोठी होती. परंतु कालांतराने या उत्सवाला घरघर लागली. अनेक विविध घटनांमुळे मंडळांची संख्या कमी होत गेली.उत्सवाला सार्वजनिक स्वरूप यावेसार्वजनिक उत्सवातून कमी होणारे कार्यकर्ते, नेत्यांचे झालेले दुर्लक्ष, पोलीस प्रशासनाचे नियम, महागडे देखावे, या कारणांमुळे उत्सवाला अधिकच उतरती कळा आली आहे. लोकांचा सहभाग आणि सार्वजनिक हितासाठी नेते, कार्यकर्त्यांनी उत्सव अधिक लोकाभिमुख केला तर सर्वसामान्यांचाही सहभाग वाढू शकतो.कार्यकर्त्यांचा राजकारणातील सक्रिय सहभाग वाढत गेला आणि सामाजिक सण उत्सवाची नाळ तुटत गेली. राजकारण आणि स्वहिताला महत्त्व प्राप्त झाल्याने सार्वजनिक मंडळे हळूहळू कमी झाली. ज्यांची इच्छा आहे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. निवडणुकीचा ज्वर वाढला तर उत्सवाला बहर येतो. इतरवेळी मात्र कुणीही मदतीला पुढे येत नसल्याचा अनुभव जुन्या कार्यकर्त्यांना येत आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिकNashik Floodनाशिक पूर