शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

‘त्या’ सात महिन्यांत नाशिककरांना चक्क ७ कोटींचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

लॉकडाऊन घोषित होताच २५ मार्च ते २३ डिसेंबर २०२० पर्यंत शहर वाहतूक शाखेकडून लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यावर विशेष भर ...

लॉकडाऊन घोषित होताच २५ मार्च ते २३ डिसेंबर २०२० पर्यंत शहर वाहतूक शाखेकडून लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला गेला होता. या काळात अत्यावश्यक सेवा किंवा आपत्कालीन वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त अन्य कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यानच्या काळात हुल्लडबाजी करत दुचाकींवरुन मिरविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यावेळी डिसेंबर अखेरपर्यंत एकूण ६ कोटी ९९ लाख ५५ हजार ७५० रुपयांचा दंड वाहतूक शाखेकडून केला गेला. यापैकी आतापर्यंत सुमारे ९८ लाख ६० हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दंडाची रक्कम अद्याप थकीत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात सर्वत्र मास्कचा वापर बंधनकारक तेव्हाही करण्यात आला होता आणि आजही करण्यात आला आहे. सध्या शहर पोलिसांकडून मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात नसली तरी मागील वर्षी मात्र मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यास थेट अदखलपात्र गुन्हे (एन.सी) दाखल केले जात होते. अशा प्रकारे सुमारे १९ हजार ९७२ लोकांवर गुन्हे दाखल केले गेले तर सहा लोकांवर एफआयआर नोंदविण्यात आला.

----इन्फो---

राज्य पोलीस कायद्यानुसार अशी झाली कारवाई

लोकांपासून सुरक्षित अंतर न राखणे तसेच सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वर्तन करताना आढळून आलेल्या ३४६ लोकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ नुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. तसेच दुकानांसमोर सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करणे, गर्दी होऊ दिल्याप्रकरणी २४४ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध २ हजार ६५२ लोकांवर याप्रमाणे कारवाई झाली होती. तसेच कलम ११५/११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या सुमारे २०७ थुंकीबहाद्दरांना कारवाईचा दणका देण्यात आला होता.

---- पाॅइंटर्स---

दाखल गुन्हे - ३९,१४२

विनामास्क कारवाई- २२,६३०