शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

नाशिक पोलिसांनी रोखला परप्रांतीय मजुरांचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 21:13 IST

शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकोरोनामुळे बेघर मजुरांचे स्थलांतर बेरोजगारीमुळे निवडला परतण्याचा पर्यायगावाच्या ओढीने मजल दरमजल पायी प्रवास

नाशिक : बिऱ्हाड डोक्यावर घेऊन कच्च्याबच्यांसह आपले मूळ गाव गाठण्यासाठी लॉकडाउन काळातसुद्धा परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर सुरूच आहे. अशाचप्रकारे शंभराहून जास्त मजूर उड्डाणपुलावरून पुढे सरकत असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागल्याने गुरुवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास मुंबईनाका पोलिसांनी तत्काळ उड्डाण पुलावरून मार्गस्थ होत असलेल्या मजुरांना रोखले असून, ताब्यात घेतलेल्या सर्व स्थलांतरितांची आनंदवली भागातील निवारागृहात रवानगी करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये रोजगार बुडाला आहे. सरकारकडून जरी मजुरांची निवास, भोजनाची हमी घेतली जात असली तरीदेखील मजुरांना आपल्या मूळ घराची लागलेली ओढ शांत बसू देत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. नाशिकमध्ये यापूर्वीही मोठ्या संख्येने अशा मजुरांना रोखले गेले आहे. मुंबईनाका भागातील उड्डाण पुलावर यातील सुमारे शंभर नागरिकांना पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखले. अचानक उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तेथे धाव घेतली. महिला, पुरुष आणि मुले त्यांना दिसून आली. या सर्वांना सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत उड्डाणपुलावर पोलिसांनी रोखले. या नागरिकांकडे प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात या नागरिकांनी आपले मूळ गाव उत्तर भारतात असल्याचे सांगितले. यात काही महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. राज्य सरकारच्या आदेशानुसार या नागरिकांचा प्रवास पुढे सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी या सर्व नागरिकांची रवानगी गंगापूररोडवरील आनंदवली भागातील महापालिकेच्या शेल्टर होममध्ये केली आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जेवणाची सोयही  प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आतापर्यंत आठशेपेक्षा अधिक पायी व वाहनातून अनधिकृ त प्रवास करणाऱ्या नागरिकांना पकडण्यात आले आहे. या नागरिकांना वेगवेगळ्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या नागरिकांपैकी एक करोनाग्रस्त आढळून आला आहे. दररोज शेकडो नागरिक मजल दरमजल करत कित्येक मैल अंतर रणरणत्या उन्हात आपला जीव धोक्यात घालत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक