शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

साहित्य संमेलनासाठी नाशिक हाच पर्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:44 IST

नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळपाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची ...

नाशिक : साहित्य संमेलनाच्या स्थळपाहणीसाठी आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी सकाळीच प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीच्या जागेची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच दिल्लीने जरी प्रस्ताव दिलेला असला तरी त्या पर्यायाचा महामंडळाने विचारच केलेला नसल्याने तिथे स्थळपाहणीसाठी समितीदेखील गेली नसल्याचे सांगून महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. दादा गोरे यांनी नाशिक हाच संमेलनासाठीचा पर्याय असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

दिल्लीसारख्या शहरात कोरोनाचे प्रमाण अद्यापही प्रचंड असल्याने दिल्लीचा विचारच झालेला नसल्याचे गोरे यांनी स्थळपाहणीनंतर पत्रकारांना सांगितले. दिल्ली हा माध्यमांनीच निर्माण केलेला पर्याय आहे. महामंडळाने दिल्लीच्या नावाचा जर खरोखर विचार केला असता, तर दिल्लीत जाऊन स्थळ निवड समितीने पाहणी केली असती, असेही गोरे यांनी नमूद केले. समितीने सकाळपासून गोखले एज्युकेशन सोसायटीमधील संपूर्ण परिसर तसेच येथील सभागृह आणि मुख्य मैदानासह स्टॉल उभारणीसाठीच्या जागेची पाहणीदेखील केली. स्थळपाहणीनंतर केवळ मी समाधानी असणे पुरेसे नसून सर्व समिती सदस्यांनादेखील हे समाधानकारक वाटले असल्यास तसा अहवाल शुक्रवारी अध्यक्षांसमोरील बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचे गोरे यांनी नमूद केले. पाहणीसाठी केलेल्या स्थळ निवड समितीमध्ये कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश होता. मात्र, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आरोग्याच्या समस्येमुळे स्थळ निवड समितीच्या अन्य सदस्यांसमवेत येऊ शकलेले नव्हते. निमंत्रक लोकहितवादी मंडळाच्या वतीने अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी नाशिककरांच्या वतीने लोकहितवादीने महामंडळाला निमंत्रण दिले असून, नाशिकला संमेलन मिळाल्यास सर्व नाशिककरांच्या सहकार्याने ते यशस्वी करुन दाखवू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी लोकहितवादी मंडळाचे मुकुंद कुलकर्णी, किरण समेळ, सुभाष पाटील, शंकर बोराडे, संजय करंजकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

शुक्रवारी स्थळाबाबत होणार अंतिम घोषणा

स्थळ निवड समिती त्यांचा अहवाल शुक्रवारी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे. त्यानंतर शुक्रवारीच पुन्हा त्यानंतरच्या बैठकीनंतर औरंगाबादला पत्रकार परिषद घेऊन स्थळ निश्चितीबाबतची अंतिम घोषणा करण्यात येणार आहे.