शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

नाशिकच्या मुलींना उपविजेतेपद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST

नाशिक : महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाकडून निसटता पराभव ...

नाशिक : महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाकडून निसटता पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साडेचार दशकांहून अधिक काळाच्या इतिहासात नाशिकच्या मुलींचा संघ प्रथमच फायनलपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सुरू असलेल्या ४७ व्या महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नाशिकने गतवर्षीच्या उपविजेत्या पुणे संघावर २ गडी आणि २.५० सेकंदांचा वेळ राखून मात करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली; मात्र अंतिम सामन्यात नाशिकला ती विजयी लय कायम राखता आली नाही. नाशिक विरुद्ध उस्मानाबाद या दोन संघातील मुलींचा अंतिम सामना मध्यांतराला ७ विरुध्द ७ अशा समान गुण संख्येवर होता. नाशिकने आपल्या पहिल्या आक्रमणात उस्मानाबाद संघाचे सात गडी बाद केले. नाशिकच्या वृषाली भोयेने धारधार आक्रमण करत ४ गडी बाद केले. तिला कौसल्या पवार १ गडी, ऋतुजा सहारे, मनीषा पडेर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. नाशिककडून संरक्षण करताना सरिता दिवाने २.५० सेकंद, कौसल्या पवार व ऋतुजा सहारे यांनी प्रत्येकी १.४५ तर निशा वैजल नाबाद १.२०मिनिट संरक्षण केले. त्यांना उस्मानाबादचे चारच गडी बाद करता आले. त्यामुळे उस्मानाबाद संघाने पाच गडी बाद करण्याचे आव्हान पूर्ण करीत अंतिम सामना १२ विरुद्ध ११असा १ गुण व तीन मिनिट राखून जिंकला. नाशिकच्या या कामगिरीबद्दल संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी मुलींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

इन्फो

वृषाली भोये ठरली सर्वोत्कृष्ट आक्रमक

नाशिकची वृषाली भोये ही स्पर्धेतील सर्वोकृष्ट आक्रमक ठरली. तिला ५००० रुपये चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.सामन्याच्या शेवटच्या डावात चार मिनिटे आक्रमण झाल्यानंतर नाशिकची कर्णधार कौसल्या पवार ही खुंट्यावर धडकल्याने जायबंदी झाली. त्यामुळे नाशिकच्या मुलींचे लक्ष विचलित झाल्यानेच विजेतेपद हुकले.

इन्फो

शिस्तबद्ध प्रयत्नांचे फळ

नाशिकचे खो-खो संघटक मंदार देशमुख यांनी ४ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कुळवाडी, तोरंगण येथील आदिवासी पाड्यांवरून निवडलेल्या १५ मुलींची नाशिकमध्ये राहण्याची तसेच शिक्षणाची सोय करीत त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना खो-खोचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षक गीतांजली सावळे-देशमुख आणि प्रशिक्षक उमेश आटवणे यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी स्टेडियमवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच उपविजेतेपदापर्यंत यश शक्य झाल्याची भावना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केली.

फोटो

०६भोये, ०५ खो-खो