शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या मुलींना उपविजेतेपद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST

नाशिक : महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाकडून निसटता पराभव ...

नाशिक : महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या संघाला अंतिम सामन्यात उस्मानाबाद संघाकडून निसटता पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. साडेचार दशकांहून अधिक काळाच्या इतिहासात नाशिकच्या मुलींचा संघ प्रथमच फायनलपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे सुरू असलेल्या ४७ व्या महाराष्ट्र कुमार व मुली गट अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नाशिकने गतवर्षीच्या उपविजेत्या पुणे संघावर २ गडी आणि २.५० सेकंदांचा वेळ राखून मात करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली; मात्र अंतिम सामन्यात नाशिकला ती विजयी लय कायम राखता आली नाही. नाशिक विरुद्ध उस्मानाबाद या दोन संघातील मुलींचा अंतिम सामना मध्यांतराला ७ विरुध्द ७ अशा समान गुण संख्येवर होता. नाशिकने आपल्या पहिल्या आक्रमणात उस्मानाबाद संघाचे सात गडी बाद केले. नाशिकच्या वृषाली भोयेने धारधार आक्रमण करत ४ गडी बाद केले. तिला कौसल्या पवार १ गडी, ऋतुजा सहारे, मनीषा पडेर यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. नाशिककडून संरक्षण करताना सरिता दिवाने २.५० सेकंद, कौसल्या पवार व ऋतुजा सहारे यांनी प्रत्येकी १.४५ तर निशा वैजल नाबाद १.२०मिनिट संरक्षण केले. त्यांना उस्मानाबादचे चारच गडी बाद करता आले. त्यामुळे उस्मानाबाद संघाने पाच गडी बाद करण्याचे आव्हान पूर्ण करीत अंतिम सामना १२ विरुद्ध ११असा १ गुण व तीन मिनिट राखून जिंकला. नाशिकच्या या कामगिरीबद्दल संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी मुलींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

इन्फो

वृषाली भोये ठरली सर्वोत्कृष्ट आक्रमक

नाशिकची वृषाली भोये ही स्पर्धेतील सर्वोकृष्ट आक्रमक ठरली. तिला ५००० रुपये चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.सामन्याच्या शेवटच्या डावात चार मिनिटे आक्रमण झाल्यानंतर नाशिकची कर्णधार कौसल्या पवार ही खुंट्यावर धडकल्याने जायबंदी झाली. त्यामुळे नाशिकच्या मुलींचे लक्ष विचलित झाल्यानेच विजेतेपद हुकले.

इन्फो

शिस्तबद्ध प्रयत्नांचे फळ

नाशिकचे खो-खो संघटक मंदार देशमुख यांनी ४ वर्षांपूर्वी जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कुळवाडी, तोरंगण येथील आदिवासी पाड्यांवरून निवडलेल्या १५ मुलींची नाशिकमध्ये राहण्याची तसेच शिक्षणाची सोय करीत त्यांचे पालकत्व स्वीकारले. त्यांना खो-खोचे प्रशिक्षण देत त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी प्रशिक्षक गीतांजली सावळे-देशमुख आणि प्रशिक्षक उमेश आटवणे यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी स्टेडियमवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळेच उपविजेतेपदापर्यंत यश शक्य झाल्याची भावना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी व्यक्त केली.

फोटो

०६भोये, ०५ खो-खो