नाशिक : ‘स्वच्छ नाशिक-सुंदर नाशिक’ असा भलेही नारा दिला जात असला तरी सोलापूर, ठाणे आणि धुळे या शहरांपेक्षाही नाशिक गलिच्छ असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने दि. ४ जानेवारी ते ४ फेबु्रवारी २०१७ या कालावधीत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिक शहराची घसरण झाली असून, ४३४ शहरांच्या यादीत नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. गेल्यावेळी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा ७३ शहरांमध्ये ३१ वा क्रमांक आला होता. यंदा देशभरातील ५०० शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी ४३४ शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. खतप्रकल्पाचे खासगीकरण, नवीन घंटागाड्या, शौचालयांची सुविधा यासह चकाचक रस्ते आदी सुविधा महापालिकेने पुरवूनही नाशिकचा क्रमांक घसरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण करणे व शहरी क्षेत्रांमध्ये स्वच्छता सुनिश्चित करण्यावर भर देणे या उद्देशाने केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम गेल्या वर्षापासून राबविण्यात येत आहे. मागील वेळी सदर सर्वेक्षणासाठी देशातील प्रमुख ७३ शहरांची निवड करण्यात आली होती. त्यात नाशिक शहराचा ३१ वा क्रमांक आला होता. यंदाही २७ जानेवारीला केंद्रीय पथक शहराच्या सर्वेक्षणासाठी आले होते. यावर्षी मात्र, सर्वेक्षणासाठी ५०० शहरांची निवड करण्यात आली होती. खतप्रकल्पाचे केलेले खासगीकरण, नव्याने धावणाऱ्या घंटागाड्या, गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी अभियान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेली साडेसहा हजार शौचालये यामुळे यंदा नाशिकचा पहिल्या दहा ते वीस शहरांच्या यादीत क्रमांक लागेल, असा दावा प्रशासनाकडून छातीठोकपणे केला जात होता. गुरुवारी (दि. ४) स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा नाशिकचा देशात १५१ वा क्रमांक तर महाराष्ट्रातील ४४ शहरांमधून १५ वा क्रमांक आला आहे. नाशिकच्या अगोदर नवी मुंबई -८ , पुणे-१३, बृहन्मुंबई-२९, शिर्डी-५६, पिंप्री चिंचवड- ७२, चंद्रपूर-७६, अंबरनाथ-८९, सोलापूर- ११५, ठाणे- ११६, धुळे-१२४, मीरा-भार्इंदर- १३०,
सोलापूर, ठाणे, धुळेपेक्षा नाशिक गलिच्छ
By admin | Updated: May 5, 2017 00:37 IST