शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

पर्यटकांना नाशिकची भुरळ ; पावसाळी पर्यटनासाठी वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 16:53 IST

कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची मौज लुटण्यासाठी अनेक पयटकांचा नाशिककडे कल वाढला आहे. 

ठळक मुद्देनाशिकच्या हिरवळीची पर्यटकांना भुरळ पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचा ओघ वाढलाधार्मिकसोबत निसर्ग पर्यटकांची नाशिकला पसंती

नाशिक : कुंभनगरी म्हणून परिचित असलेले नाशिक नेहमीच धार्मिक पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण राहिलेले असून येथील काळाराम मंदीर,पंचवटी, सिंतागुंफा यासह बारा जोतीर्लींगांपैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासोबतच येथील निसर्ग पर्यटनाची मौज लुटण्यासाठी अनेक पयटकांचा नाशिककडे कल वाढला आहे. नाशिकमधील विविध धार्मिक स्थळे देशविदेशातील पर्यटकांकांचे आकर्षण ठरेले असून पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पसरलेल्या  निर्सग पर्यटकासोबत हिरवळीची धार्मिक पर्यटकांंनाही भुरळ पडत असून गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसासोबतच नाशिकला येणाºया पर्यटकांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. 

गेल्या दशकभरात नाशिकच्या पर्यटनाच्या कक्षा खूपच विस्तारल्या आहेत. देव-देवतांचा आशीर्वाद लाभलेल्या या भूमीला निसर्गाचेही भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्गसुंदर स्थळांना भेटी देणे हा पर्यटकांचा नित्य उपक्रम बनत असून पावसाळ््यात अनेक पर्यटक नाशिकला पसंती देत आहे. मात्र यातील अनेक पर्यटक गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने कोणतीही पूर्व तयारी न करताच नाशिकच्या पर्यटनासाठी बाहेर पडल्याने त्यांनी शनिवारपासून कोसळणाºया संततधार पावसाने काहीसी गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी पर्यटक पावसापासून बचावासाठी पास्टिकच्या पानघोंगड्यांचा आधार घेताना दिसून येत आहे. तर अनेक पर्यटकांना नाशिकचा मुक्काम वाढवावा लागत असून स्थानिक बाजारपेठेतन रेनकोट छत्र्यांची खरेदी करून अनेक पर्यटक नाशिक पर्यटनाचा आनंद लूटत आहेत. त्यासोबतच कोणत्याही निव्वल पावसात भिजून चिंब होण्यासाठीही अनेक पर्यटक गोदा काठावर दाखल झाल्याचे दिसून येत आहे. 

पर्यटनाची आकर्षणे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे धार्मिक पर्यटनस्थळांत नाशिकचे आगळेच स्थान असून  त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंगसह ब्रह्मगिरी, गंगाद्वार, संत निवृत्तीनाथ मंदीर, सप्तश्रुंग गड, चांदवडची रेणूकादेवी, टाकेदचे जटायू मंदीर, अंजनेरीचे हनुमान मंदीर, रामदास स्वामींची टाकळी, इगतपुरीतील घाटनदेवी, कावनई तीर्थक्षेत्र,   पंचवटीचा गोदाघाट, तपोवन, सिंहस्थ गोदावरी मंदीर, गंगा गोदावरी मंदीर, काळाराम मंदीर, कपालेश्वर मंदीर, सुंदर नारायण मंदीर, नारोशंकराची घंटा, दुतोंड्या मारुती, बालाजी मंदीर, मुरलीधर मंदीर, यशवंतराव महाराज मंदीर, सीतीगुंफा, मोदकेश्वर गणपती, काट्या मारुती, भक्तीधाम, मुक्तीधाम, गुरू गंगेश्वर मंदीर, पांडवलेणी, बुध्द स्मारक,  चामरलेणी अशी एक ना अनेक धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. साईबाबांच्या शिर्डीमध्ये येणारे देश विदेशातील भाविकांना नाशिकच्या पर्यटनाची आकषर्ण असलेली कें द्र भुरळ घालताना दिसून येत आहे.