शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

नाशिककरांना पुन्हा वातावरण बदलाचा फटका; दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 21:41 IST

वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला तर कमाल तपमानाचा पारा ३२.४ अंशांवर स्थिरावला.

ठळक मुद्दे फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा रात्री थंडीचा कडाका जाणवतो

नाशिक : वातावरण बदलाचा फटका पुन्हा नाशिककरांना बसू लागला आहे. अचानकपणे वातावरणात बदल होऊन दिवसा कडक ऊन, तर रात्री थंडीचा कडाका जाणवत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.वातावरण बदलामुळे शहरात पुन्हा सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. नागरिकांना दिवसा आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. शहराचे कमाल तपमान ३० अंशांच्या पुढे व किमान तपमान २० अंशांच्या आसपास राहत होते; मात्र मंगळवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा थेट १३.४ अंशांवर घसरला तर कमाल तपमानाचा पारा ३२.४ अंशांवर स्थिरावला. सोमवारी किमान तपमान १९ अंश इतके होते. एकूणच तपमानात होणारी कमी-जास्त वाढ व हवामानात झालेला बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरत आहे. संध्याकाळनंतर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होते, तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो. पहाटेदेखील थंडीची तीव्रता अधिक जाणवते; मात्र सूर्योदयानंतर उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात होते. दिवसभर आॅक्टोबर हिटचा तडाखा नागरिकांना जाणवत आहे. हवामान बदल आणि शहरात वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्यामुळे औषध फवारणी, स्वच्छता होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे लक्ष देऊन आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे, आइस्क्रीम खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, तळलेले पदार्थ खाऊ नये, उन्हात फिरताना नाकातोंडाला रुमाल लावावा, डोक्यावर टोपी परिधान करावी, संध्याकाळीदेखील बाहेर फिरताना काळजी घ्यावी, दुचाकीवरून प्रवास करताना नाका-तोंडाला रुमाल लावावा व कानात कापसाचे बोळे ठेवावे, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.