शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

नाशिक @38.9

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 00:02 IST

तपमानात घट : दमट हवामानामुळे नाशिककर घामाघूम

 नाशिक : गेल्या बुधवारी शहराच्या तपमानाचा पारा ४१ अंशांवर पोहचला होता. यावर्षीची सर्वाधिक तपमानाची नोंद हवामान खात्याने केली. याबरोबरच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढत असल्याने उन्हाचा चटका अन् उकाड्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. गुरुवारी (दि.१९) तपमानात काही प्रमाणात घट होऊन ३८.९ अंश इतके तपमान नोंदविले गेले.शहराचे वाढते तपमान व दमट हवामानामुळे प्रचंड उष्मा जाणवत होता. उन्हाच्या तीव्र झळांबरोबरच मुंबईकरांप्रमाणे नाशिककरांचाही घाम निघाला. दमट हवामानामुळे रात्रीही उकाडा जाणवत असल्याने घरात बसणे कठीण झाले होते. मागील तीन दिवसांपासून सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हवेतील आर्द्रतेचे प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा अधिक होते, तर रात्री यामध्ये वाढ होऊन दमट हवामानामुळे उकाडा वाढला होता. त्यामुळे शीतपेय, वातानुकूलन यंत्र, पंखे, कुलर आदिंचा वापर सध्या शहरात वाढल्याचे चित्र दिसत आहे. यावर्षी ३४.३ (२४ एप्रिल) सर्वांत कमी तपमान नोंदविले गेले; मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहराच्या तपमानाचा आलेख चढता आहे. तपमानाचा पारा गुरुवारी काही अंशांनी कमी झाला असला तरीदेखील उन्हाची तीव्रता ही जाणवत होती. शहरात दिवसभर वाऱ्याचा वेग टिकून राहिल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही काहीसे कमी होण्यास मदत झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे गुरुवारी नाशिककरांना दुपारनंतर उकाडा कमी जाणवला.