शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

नार-पार गिरणा नदीजोड योजनेत फेरबदल अन्यायकारक ; पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 14:50 IST

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी तसेच राज्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...

ठळक मुद्देजलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार भूमिकालोकप्रतिनिधींची एकजूट

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी तसेच राज्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नदीजोडमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.बुधवारी (दि. २२) शासकीय विश्रामगृहावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार व खासदारांना नार-पार व गिरणा नदीजोड योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या प्रकल्पातून महाराष्टÑाला ८८७ दलघमी पाणी मिळणार आहे. त्यातील ४३४ दलघमी पाणी गुजरातला देण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले असून, उर्वरित ४०३ दलघमी पाणी महाराष्टÑासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. मात्र, राज्यात उपलब्ध होणारे सर्वच्या सर्व पाणी महाराष्टÑालाच मिळाले पाहिजे, अशी भूमिका उपस्थित खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार दीपिका चव्हाण, आमदार कुणाल पाटील यांनी घेतली. त्याचवेळी नार-पार प्रकल्पाचे अभ्यासक विश्वास देवरे यांनी जलसंपदा खात्याच्या कारभारावर टीका करीत चुकीच्या पद्धतीने प्रकल्प अहवाल तयार केल्याचे सांगितले. यावेळी बैठकीस उपस्थित जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता डी. बी. मुसळे यांनी आधीच्या व नंतरच्या नवीन प्रकल्प अहवालाची माहिती दिली. गणेश धात्रक यांनी मनमाड व नांदगावलाही या योजनेतून काही तरी पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली, तर बुवा यांनी चांदवडवर नेहमीच अन्याय होत असल्याची टीका केली. आमदार जे. पी. गावित यांनी जलसंपदा विभागावर टीका करताना स्थानिकांना विश्वासात न घेताच योजना व प्रकल्प तयार केले जातात; मात्र आमच्यावर अन्याय झाल्यास तुमच्या योजना कागदावरच राहतील, असा इशारा दिला. माजी आमदार संजय चव्हाण यांनी पहिलाच प्रकल्प अहवाल कायम ठेवण्याची मागणी केली. या योजनेचे नव्याने फेरसर्वेक्षण करून उपस्थित लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊ, असे आश्वासन महेंद्र आमले यांनी दिले. आमदार कुणाल पाटील यांनी धुळे व जळगावसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून, यापुढील बैठकांना उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींना बोलवा, अशी सूचना केली.