शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

नार-पार गिरणा नदीजोड योजनेत फेरबदल अन्यायकारक ; पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 14:50 IST

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी तसेच राज्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ...

ठळक मुद्देजलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटून मांडणार भूमिकालोकप्रतिनिधींची एकजूट

नाशिक : सन २०११ साली तयार करण्यात आलेला नार-पार व गिरणा नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल (पीएफआर) कसमासह पूर्व भागास पाणी मिळवून देणारा होता; मात्र जलसंपदा विभागाने हा अहवाल गुंडाळून नवीन तयार केलेला अहवाल जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, याविरोधात सर्वपक्षीय आमदार-खासदारांनी तसेच राज्यमंत्र्यांनी एकत्रितरीत्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नदीजोडमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.बुधवारी (दि. २२) शासकीय विश्रामगृहावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार व खासदारांना नार-पार व गिरणा नदीजोड योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या प्रकल्पातून महाराष्टÑाला ८८७ दलघमी पाणी मिळणार आहे. त्यातील ४३४ दलघमी पाणी गुजरातला देण्याचे जलसंपदा विभागाने प्रस्तावित केले असून, उर्वरित ४०३ दलघमी पाणी महाराष्टÑासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. मात्र, राज्यात उपलब्ध होणारे सर्वच्या सर्व पाणी महाराष्टÑालाच मिळाले पाहिजे, अशी भूमिका उपस्थित खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार दीपिका चव्हाण, आमदार कुणाल पाटील यांनी घेतली. त्याचवेळी नार-पार प्रकल्पाचे अभ्यासक विश्वास देवरे यांनी जलसंपदा खात्याच्या कारभारावर टीका करीत चुकीच्या पद्धतीने प्रकल्प अहवाल तयार केल्याचे सांगितले. यावेळी बैठकीस उपस्थित जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता डी. बी. मुसळे यांनी आधीच्या व नंतरच्या नवीन प्रकल्प अहवालाची माहिती दिली. गणेश धात्रक यांनी मनमाड व नांदगावलाही या योजनेतून काही तरी पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली, तर बुवा यांनी चांदवडवर नेहमीच अन्याय होत असल्याची टीका केली. आमदार जे. पी. गावित यांनी जलसंपदा विभागावर टीका करताना स्थानिकांना विश्वासात न घेताच योजना व प्रकल्प तयार केले जातात; मात्र आमच्यावर अन्याय झाल्यास तुमच्या योजना कागदावरच राहतील, असा इशारा दिला. माजी आमदार संजय चव्हाण यांनी पहिलाच प्रकल्प अहवाल कायम ठेवण्याची मागणी केली. या योजनेचे नव्याने फेरसर्वेक्षण करून उपस्थित लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊ, असे आश्वासन महेंद्र आमले यांनी दिले. आमदार कुणाल पाटील यांनी धुळे व जळगावसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून, यापुढील बैठकांना उत्तर महाराष्टÑातील लोकप्रतिनिधींना बोलवा, अशी सूचना केली.