शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

नांदूरशिंगोटे, दोडीत धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST

नांदूरशिंगोटे : जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने कमी होत असताना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक या ...

नांदूरशिंगोटे : जिल्ह्यात व सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाबाधित व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने कमी होत असताना सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक

या गावांमध्ये मात्र कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन महसूल, पोलीस, पंचायत समिती व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त कारवाईस सुरुवात केलेली आहे. नांदूरशिंगोटे व परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कडक मोहीम राबवली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार राहुल कोताडे, सहायक पोलीस निरीक्षक, सागर कोते, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. मोहन बच्छाव, नायब तहसीलदार, ललिता साबळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नांदूरशिंगाेटे येथे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना इंडिया बुल वसतिगृह येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गृहविलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींची घरी जाऊन पाहणी करण्यात आली. गृहविलगीकरणाचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना इंडिया बुल येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदूरशिंगोटे येथे एकूण १५७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून बाधित आढळून आलेल्या ४ व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना चाचणीसाठी डॉ. नितीन म्हस्के व डॉ. राहुल हेंबाडे यांच्या पथकाने कार्यवाही केली. प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीमध्ये ३ पेट्रोलपंपांवरही कार्यवाही करण्यात आली असून एकूण ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

-----------------------

नियम पाळणे बंधनकारक

नांदूरशिंगोटे व दोडी येथे केलेल्या तपासणीमध्ये सर्व आस्थापनाचालकांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे व असे प्रमाणपत्र नसल्यास संबंधित आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या परिसरात कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आरसीएफच्या २५ जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत कोरोना नियमांचे पालन न करणारे व विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींची वाढती संख्या, मृत्यूचे प्रमाण तसेच लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या संसर्ग विचारात घेता सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.