शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: November 23, 2014 23:11 IST

नांदूर-चास रस्त्याची दुरवस्था

नांदूरशिंगोटे : नांदूरशिंगोटे - चास -नळवाडी-कासारवाडी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. नांदूरशिंगोटे व चास ही दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी असतानाही या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर नांदूरशिंगोटे, चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदिं गावे आहेत. सिन्नर व अकोले तसेच संगमनेर तालुक्याच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नांदूरशिंगोटे ते चास या रस्त्याची गेल्या ४ ते ५ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी डांबर उखडले आहे, तर अनेक ठिकाणी रस्ता अक्षरश: खचून गेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गापासून जाणाऱ्या नांदूरशिंगोटे ते चास या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे सुमारे दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील या रस्त्याकडे दहा वर्षांत पुन्हा लक्ष देण्यात आलेले नाही. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते. रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. सदर रस्ता पुढे अकोले व संगमनेर तालुक्यांत जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त असते. तथापि, रुंदी कमी झाल्याने या रस्त्याने एकावेळी एकच वाहन चालण्यास जागा राहिली आहे. अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रसंग नित्याचे झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेण्यासाठीही हाच रस्ता सोयिस्कर असल्याने या मार्गे अवजड वाहनांचीही वर्दळ नेहमीचीच झाली आहे. गेल्या वर्षी खासदार निधीतून या भागातील चास-नळवाडी, कासारवाडी-चास, नळवाडी-कासारवाडी आदि एकेक किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेले असतानाही त्यांची कामे अपूर्ण आहेत. या भागात दोन जिल्हा परिषद सदस्य असतांनाही रस्त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा होत नसल्याने भोजापूर खोरे व नांदूरशिंगोटे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. नांदूरशिंगोटे ते चास या महत्त्वाच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जगनपाटील भाबड, शंकर सानप, आनंदा शेळके, शंकर शेळके, पोपट शेळके, शिवाजी दराडे, रावसाहेब दराडे, दीपक बर्के, बाळासाहेब देशमुख, सुनील खैरनार, संजय खैरनार, सुभाष दराडे, राजेंद्र शेळके, मंगेश शेळके, भारत दराडे, सुदाम आव्हाड आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)