शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

‘तिथे’ नंदीविना महादेव तर ‘इथे’ महादेवाविना नुसताच नंदी

By admin | Updated: December 8, 2015 00:16 IST

‘तिथे’ नंदीविना महादेव तर ‘इथे’ महादेवाविना नुसताच नंदी

असं म्हणतात की, महादेवाच्या दर्शनाला गेलं आणि तो व्यस्त असला तर नुसत्या नंदीचं दर्शन जरी झालं तरी महादेवापर्यंत तुमचा नमस्कार पोचता होतो. अडचण येत नाही.पण कपालेश्वराची बातच न्यारी. तिथे नंदीच नाही. का नाही, याच्या अनेक आख्यायिका. पण त्या घोळात पडायलाच नको. त्यातल्या एका आख्यायिकेप्रमाणे नंदीने आपली शिंगे खुपसून म्हणे एक ब्रह्महत्त्या केलेली असते. हत्त्या होताक्षणी त्याची शुभ्र कांती कृष्णवर्णी होते. मग त्याला रामकुंडातील स्नानाचा उपाय समजतो. हा उपाय करताक्षणी त्याची कांती पूर्ववत होते.कालांतराने महादेवाच्या हातूनदेखील ब्रह्महत्त्या होते. तीदेखील थेट ब्रह्मदेवाची. नंदीजवळ उपाय असतोच. तो उपाय महादेवाला सांगितला जातो. महादेवही मग हा उपाय करण्यासाठी रामकुंडात स्नान करतो. ब्रह्महत्त्येच्या पापापासून मुक्ती! पण हा उपाय करण्यापूर्वी बहुधा नंदी महादेवाला सांगतो, तुमचं तुम्ही निपटा. मी सोबत येणार नाही. त्यामुळं कपालेश्वरी नंदी नाही. त्याचा चांगला परिणाम म्हणजे नंदीचा पर्याय नाही. महादेव म्हणजे महादेव. त्याचं दर्शन अगदी होणार म्हणजे होणार. अर्थात हे सारं झालं पुराणकाळात. आज तो काळ काही राहिलेला नाही. कालौघात सारंच काही बदलून जात असतं. तसंच इथंही झालेलं दिसून येतं.परिणामी कपालेश्वरापासून जेमतेम दोनेक मैल अलीकडे वेगळीच तऱ्हा अनुभवायला येते. इथला महादेव म्हणे कायम गायबच असतो. अखेर तो कलियुगातलाच. त्यामुळं तो काही नंदीवर बसून भ्रमण करीत नाही. त्याला भ्रमणासाठी म्हणे कायम रेल्वेचं इंजीनच लागतं. मुळात इंजीन रेल्वेचं आणि महादेव कलियुगातला. तेव्हांं एका जागी दोघेही थोडेच थांबणार.तरीही या कलियुगातल्या महादेवाचे दर्शनेच्छुक तसे खूप. ते येतात आणि देव्हारा रिकामा पाहून थबकतात. देव्हारा भले रिकामा असो पण देव्हाऱ्याच्या बाजूच्याच चौथऱ्यावर नंदी आपला ठाण मांडून बसलेलाच असतो. त्याला तसंही फार काही काम नसतं. पण तरीही महादेवाचे भक्तगण या नंदीकडे जायला तसे फार उत्सुक नसतात. कारण येणाऱ्या जाणाऱ्याला उगा ढुशा मारत राहण्याचा आणि आपली शिंगे उगारीत बसण्याचा त्याला म्हणे छंदच जडलेला असतो. तो आपणहून साऱ्या महादेवा दर्शनाभिलाषींना आपल्याकडं ओढून नेतो. मी भले नंदी असेन पण ‘उप महादेवही आहे’ याची तो अभ्यागतांना राहून राहून आठवण करुन देत असतो. महादेवालाही ही रचना पसंत पडलेली असते. मुळातच हा महादेव कलियुगातला. शाप वा अमृत कोणत्याही वाणीचा त्याला जात्याच कंटाळा. वाणीचा वापर करायचा म्हटलं की त्याचा अंगाचा म्हणे थरकाप होतो. त्याउलट उपमहादेव उर्फ नंदी. सतत टिवटिवत राहणे त्याला अगदी मनापासून पसंत. हे टिवटिवणंदेखील स्वत:च्या चौथऱ्यावर शांत बसून नाही तर इकडे तिकडे सारखं हुंदडत राहून. हुंदडता हुंदडता मग कोणाला ढुशी मार, कुणाला शिंगावर घे, कुणाकडे मारकुट्या नजरेनं बघत रहा, हेदेखील अव्याहत सुरु. आता आताशा भक्तगणही म्हणू लागलेत, यार ते कपालेश्वरांचं बरं आहे. तिथं नंदीचा काही सुडगुडाट नाही आणि इथं या नंदीच्या तापाखेरीज दुसरं काही नाही. जरा अदलाबदल झाली तर बरं(महादेव आणि नंदी यांच्यावर योजलेल्या रुपकामुळे त्या दोहोंनी कृपा करुन कोप करु नये)