शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव जमीन घोटाळा; मंडळ अधिकारी अटकेत

By admin | Updated: April 15, 2017 00:57 IST

नांदगाव जमीन घोटाळा; मंडळ अधिकारी अटकेत

नाशिक : चार महिन्यांपूर्वी नांदगाव तालुक्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक दाखल केलेल्या गुन्"ात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केलेल्या एका मंडळ अधिकाऱ्यास अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला यश आले आहे; मात्र हे संपूर्ण प्रकरण वेगळ्याच वळणावर गेल्याने अहेर यांना पोलीस कोठडी मिळू शकलेली नाही. त्यामुळे लाचलुचपत खात्याची ही कारवाई कागदोपत्री ठरली असली तरी, या प्रकरणातील काही संशयितांवर त्यांनी दाखविलेली मेहेरनजर चर्चेत आहे.अशोक खंडेराव अहेर असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, सरकारी अधिकारी व खासगी व्यक्ती अशा २३ जणांविरुद्ध दाखल गुन्"ात ३१ जानेवारी २०१७ पासून ते फरार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे म्हणणे आहे. कोणत्याही गुन्"ाच्या मुळाशी जाऊन तपासाची तसेच संशयित आरोपींच्या अटकेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या डोळ्यात अहेर यांनी तब्बल साडेतीन महिने धूळ फेकली व त्यांच्या हाती ते लागले नाहीत. अखेर गुरुवारी लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी अहेर यांना अटक करून मालेगावच्या सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने अहेर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. नांदगाव तालुक्यातील नवीन अविभाज्य शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नजराणा रकमेची फसवणूक केल्याचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ५ जानेवारी रोजी दाखल केला. त्यातील एकाही संशयित आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक खाते अटक करू शकले नाही, बऱ्याच आरोपींना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर केले. जामीन न मिळू शकलेले अहेर यांना अटक करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला साडेतीन महिने लागले. (प्रतिनिधी)