शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नांदगावी प्रलयकारी अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

नांदगाव : गेल्या ४८ तासांपासून सुरु असलेल्या प्रलयकारी अतिवृष्टीने नांदगाव शहराची वाताहत केली असून, शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत. ...

नांदगाव : गेल्या ४८ तासांपासून सुरु असलेल्या प्रलयकारी अतिवृष्टीने नांदगाव शहराची वाताहत केली असून, शेकडो संसार उघड्यावर पडले आहेत. रेल्वेच्या १६० वर्षांच्या काळात प्रथमच पाणी नांदगावच्या प्लॅटफॉर्मला लागले. घरांचे पहिले मजले पाण्यात बुडाले, तर रेल्वेचा नवीन सबवेसुध्दा पाण्यात बुडाला. महापुराच्या तडाख्यात नदी किनाऱ्यावर असलेली घरे, छोट्या व्यावसायिकांची दुकाने पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून वाहून गेली. सन २००९मध्ये आलेल्या महापुराच्या आठवणी जाग्या होत असताना, यावेळी पुराचे अवसान अधिकच विनाशकारी ठरले आहे. दहेगाव धरण भरून, लेंडी नदीला पहिला पूर आला. त्या लाटेचा पहिला तडाखा महात्मा गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या दरम्यान असलेल्या पुलावरील अतिक्रमणांना बसला. या पुलावर चपला, किराणा, स्टेशनरी, फुटकळ साहित्य, चहाची टपरी, मोबाईल, इलेक्ट्रिकची दुकाने असून ती थेट नदीपात्रातच आहेत. पाण्याच्या शक्तीने आरसीसी बांधकाम असलेली दुकाने काड्यापेटीप्रमाणे फिरवली तर इतर दुकाने काही मिनिटातच प्रवाहपतित झाली.

लेंडी नदीपात्राला समांतर समता मार्गावर लोहार, सलून, चहा, हॉटेल्स, भंगारचे व्यावसायिक, ज्यूस, चपला अशी अनेक दुकाने आहेत. परंतु या मार्गावर पत्र्याची व कच्चे बांधकाम असलेली घरेसुध्दा आहेत. या सर्व घरात चार ते पाच फूट उंच पाणी साठले होते. घरातली भांडी, कपडे, सामानाच्या पेट्या सर्व जलमय होऊन मोठे नुकसान झाले. आज खायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आंबेडकर चौकात असलेल्या दुमजली व्यापारी संकुलाचा खालचा मजला पूर्णपणे पाण्यात गेला. त्यात कापडाची रेडिमेड होजीअरीची, चपला, बूट याची गोदामे आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत तिथे सात ते आठ फूट उंचीपर्यंत पाणी साठलेले होते.

----------------------

दळणवळण यंत्रणा कोलमडली

लेंडी नदीच्या पुलावर गुप्ता स्टोअर्सचे जड दुकान पाण्याच्या रेट्यापुढे रस्त्यातच आडवे झाल्याने त्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. रेल्वेने बांधलेला सब वे आठ फूट उंचीच्या पाण्याने भरून गेला. त्यामुळे औरंगाबाद - येवला रस्त्याकडे असलेल्या शहराच्या दुसऱ्या भागातील व मल्हारवाडी गावाकडील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दहेगाव नाका ते भोंगळे रस्त्यावर लेंडी नदी पात्रापर्यंत पाणीच पाणी झाले होते. गुलजारवाडी परिसरात घरांमध्ये दोन ते चार फूट उंचीचे पाणी शिरल्याने घरांमध्ये सर्वत्र गाळ साचला आहे. मटण मार्केट, बाजार समिती यात चिखल झाला.

-----------------

शाकांबरी पुलावरून पाणी

रात्री तुफान आलेल्या शाकांबरी व लेंडी नदीपात्रात महिलांनी नदी शांत व्हावी म्हणून खणा नारळाने ओटी भरली, तर मशिदीत पूर कमी होण्यासाठी रात्री नमाज अदा करण्यात आली. सकाळी उजेडात आपला विखुरलेला संसार शोधतांना महिला व मुले दिसून आली. कोणाच काय, अन कोणाच काय, अशी टिप्पणी करत संधीसाधू दुसऱ्याच्या घरातील वस्तू पळवत असल्याची चर्चा झाली. रात्री १२ वाजल्यापासून अडीच तासपर्यंत शाकांबरी नदी पुलावरून पाणी वाहात असल्याने वाहतूक बंद होती.