शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

मोक्याच्या ‘इस्टेट’वरच डल्ला

By admin | Updated: December 8, 2015 00:45 IST

१८५ गाळ्यांची तफावत : थकबाकी १२ कोटींवर; भाडे मागणी, मालमत्ता, नोंदवसुलीच्या नोंदीच नाहीत--पंचनामा महापालिकेचा

भारत चव्हाण --कोल्हापूर -महानगरपालिकेत अत्यंत बेजबाबदारपणाचा कारभार कोठे असेल तर तो इस्टेट विभागात आहे. महापालिकेच्या मालमत्ता किती आहेत, किती दुकानगाळे आहेत, त्यांच्याकडून किती भाडे वसूल होते, प्रत्येकवर्षी किती भाडे जमा व्हायला पाहिजे यांच्या कसल्याही अधिकृत नोंदी पालिकेकडे नाहीत. प्रत्येक वर्षी मागणीचे अंदाजे आकडे मांडले जातात; पण प्रत्यक्षात तेवढी वसुली होत नाही. परिणामी गेल्या काही वर्षांपासून मार्केट गाळे, केबिन्स, जागाभाडे यापोटी २०१४-१५ अखेर १२ कोटींच्या वर थकबाकी आहे. तिच्या वसुलीच्या कोणत्याही उपाययोजना अमलात आणलेल्या नाहीत. शहरातील अनेक जागरूक नागरिक महापालिकेचे सर्व कर प्रामाणिकपणे भरत आहेत. त्यातल्या त्यात सर्वसामान्य आणि गोरगरीब असणारे तर न चुकता कर भरत असतात. एखाद्या वेळी कोणी कर भरण्यास हयगय केली तर त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो; परंतु हेच अधिकारी व कर्मचारी मात्र जाणीवपूर्वक करबुडव्यांना मधले मार्ग शोधून मदत करीत असतात. मार्केट गाळे असोत, जनता बझार असो, की थकीत घरफाळ्यात सवलत असो; आपले हात ओले होत असतील तर अधिकारी, कर्मचारी परस्पर करांत सवलती देऊन मोकळे होतात. अलीकडे घरफाळा विभागात उघडकीस आलेले दंडव्याज माफीचे प्रकरण ताजे आहे. दुकानगाळे भाडेकरूंना थकबाकीबाबत मार्गदर्शन करण्यात हेच कर्मचारी पुढे असतात. इस्टेट विभागाचे लेख्यांबाबत बोलायचे तर, ‘राष्ट्रीय नगरपालिका लेखांश नियमपुस्तिका २००४’मधील तरतुदीनुसार या विभागात वसुली नोंदवही, दैनंदिन वसुली गोषवारा, मागणी नोंदवही, मागणी बिल नोंदवही, बिलांचा गोषवारा विवरणपत्र, नोटीस फी, वॉरंट फी व इतर नोंदवही अशा दहा विहित केलेल्या नमुन्यांत लेखे ठेवावे लागतात; परंतु ते महापालिकेत ठेवलेले नसल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या स्वमालकीच्या इस्टेट, इमारती, मार्के ट, खुल्या जागा, निवासस्थाने, मंडई-ओटे, केबिन्स, (हॅलो पान ६ वर)वसुली वेळेत होत नसल्याबद्दल आक्षेप वर्ष २०१२-१३ या वित्तीय वर्षाच्या लेखापरीक्षणावेळी मालमत्ता गाळे, मार्केट, खुल्या जागा, केबिन्स, कट्टे, इत्यादींची माहिती घेतली असता भाडेवसुलीपोटी ६ कोटी २७ लाख ६१ हजार ८३६ रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे. या रकमेत पुन्हा २०१४-१५ अखेर मोठी वाढ झाली आहे. १२ कोटी ०५ लाख ५१ हजार ६१३ इतकी थकबाकी झाली आहे. दलाल मार्केटमधील गाळे दोन वर्षे पडून लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केट येथे बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्यात आले. करारातील अटींप्रमाणे १०९ दुकानगाळे २३ आॅगस्ट २०१२ रोजी ताब्यात मिळाले. परंतु सदरचे गाळे २०१४-१५ च्या अखेरीस लिलावाने भोगवट्याने लागू केले आहेत. गाळेवाटपाची प्रक्रिया विलंबाने राबविल्याने गाळे दोन वर्षे अक्षरश: बेवारस पडून होते. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडले, याला जबबादार कोण? हा प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो. 01महापालिकेच्या एकूण खुल्या जागा किती, मार्केट गाळे किती, हॉल किती यांचे लेखापरीक्षण व्हायला पाहिजे.02या सर्व मिळकतींचे क्षेत्रफळ, त्यांचे सध्याचे बाजारमूल्य किती याची अद्ययावत माहिती आवश्यक. 03आरक्षणाद्वारे ताब्यात घेतलेल्या तसेच आरक्षण टाकले; परंतु अद्याप ताब्यात घेतल्या नाहीत अशा जागांचे स्वतंत्र रेकॉर्ड असायला पाहिजे. 04मार्केट गाळे, खुल्या जागा यांचे भाडे किती, वसुली किती झाली, थकबाकी किती याचे प्रत्येक मिळकतीनिहाय रेकॉर्ड असायला पाहिजे. 05ज्या मार्केट गाळ्यांचे भाडेकरार संपले आहेत, त्यांचे वाढीव दराने करार वाढविणे किंवा पुन्हा निविदा काढून ते भाड्याने देणे आवश्यक.06थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे अत्यंत आवश्यक, थकबाकीवर व्याज आकारणे आवश्यक.विचारे मार्केट गाळेवाटपातील अनियमितता मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विचारे विद्यालयाच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याची कामगिरी जयहिंद कॉन्ट्रॅक्टर्स लि. या विकासकर्त्याकड सोपविण्यात आली होती. करारानुसार त्यांनी ३.६७१ चौरस मीटर ते ७.६२४ चौरस मीटर क्षेत्रफळाचे २०० लहान गाळे महापालिकेला बांधून दिले. त्यांतील १०० गाळे बसस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याकरिता ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात आले. परंतु फेरीवाल्यांनी कोणताही गाळा ताब्यात घेतला नाही व त्याचे भाडेही जमा झाले नाही. यावरून २००४ ते २०११ पर्यंत गाळे रिकामे राहून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वास्तविक ते अन्य व्यावसायिकांना देण्याची आवश्यकता होती. मुदत संपली तरी नवे करार झाले नाहीतभाड्याने दिलेल्या गाळ्यांपैकी एकूण ६४३ गाळ्यांचे भाडेकरार २००९ ते २०१४ या वर्षात संपलेले आहेत. त्यामुळे भोगवटाधारकांबरोबर नव्याने भाडेवाढ करून करारपत्रे केलेली नाहीत. अशा मालमत्तांचे रिव्हॅलिडेशन करण्याचे अधिकार इस्टेट अधिकाऱ्यांना असतानाही त्यांचा वापर केला नसल्याचे मालमत्तांची मागणी देयके तयार झालेली नाहीत. आता त्यांना भाडेही भरावे लागत नाही. या मालमत्तांची नोंद नवीन वर्षाच्या मागणीमध्येही करण्यात आलेली नसल्याने महापालिकेचे मोठे नुकसान झाले आहे