शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा

By admin | Updated: August 28, 2016 22:22 IST

कुर्नोली : लोकप्रिय सरपंचाची व्यथा

घोटी : घोटी-वैतरणा रस्त्यावर घोटीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्नोली गावच्या महिला सरपंचाची व्यथा निराळी आहे. तब्बल पाच पंचवार्षिक सलगपणे गावगाडा हाकण्याचा मान मिळालेल्या या महिला सरपंचाला गावात राहण्यासाठी हक्काचे घरही नसल्याने त्यांचे सरपंचपद केवळ नामधारी ठरले आहे. शासन प्रत्येक बेघराला घरकुल देण्यासाठी अनेक योजना राबवित असताना अज्ञानपणामुळे आणि शासनाच्या उदासीनतेमुळे एका महिला सरपंचालाच हक्काचे घर मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.कुर्नोली (ता. इगतपुरी) येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने या गावात राहणारे पांडुरंग तेलम यांच्या कुटुंबातील महिलेला सरपंचपदाचा मान मिळतो. त्यांच्या पत्नी वेणूबाई ऊर्फ सोनूबाई पांडुरंग तेलम या गेली पंचवीस वर्षांपासून गावच्या सरपंचपदी विराजमान आहेत. सरपंचपद मिळाल्यानंतर या कुटुंबाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. डोंगर रानात वास्तव्यास असणाऱ्या या कुटुंबाला गावालगत शासकीय योजनेतून एखादा निवारा मिळेल, अशी माफक अपेक्षा होती. मात्र या अपेक्षांचा पंचवीस वर्षांपासून चुराडा होत आहे. शासकीय योजनेतून साधे घरकुलही मिळत नसल्याने अखेर या कुटुंबाने गावालगत असलेल्या दुसऱ्याच्या खासगी जागेत लाकडाची झोपडी उभारली आणि आपल्या निवाऱ्याची सोय केली आहे. गावालगत झालेल्या वाकी खापरी धरण क्षेत्रात या कुटुंबाची सर्व जमीन जाऊन हे कुटुंब भूमिहीन झाले आहे. त्याचे अनुदानही शासनाकडून येणे बाकी आहे. अशा अवस्थेत हे कुटुंब जीवन जगत आहे. विशेष म्हणजे गाव पातळीवरील सर्वोच्च पद असतानाही या कुटुंबाला शासनाच्या उदासीनतेमुळे एक घरकुलही मिळत नसल्याने या पदाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)

गावचे सरपंचपद मिळाल्यानंतर आपल्याला किमान निवाऱ्यासाठी एखाद्या शासकीय योजनेतून घरकुल मिळेल, अशी माफक अपेक्षा होती. याबाबत आपण सातत्याने पाठपुरावाही केला; मात्र कोणीही दखल घेतली नाही. - वेणूबाई तेलम सरपंच, कुर्नोली