शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

‘गाव तिथे एसटी’ नावालाच; अजूनही का सुरू होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST

नााशिक : कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर, राज्य परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रवासी नसल्याने ...

नााशिक : कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर, राज्य परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रवासी नसल्याने अजूनही लांब गावखेड्यातपर्यंत बस पोहोचू शकत नसल्याने, गाव तिथे एसटी हे ब्रीद नावापुरतेच उरले असल्याचे सध्याचे चित्र आहे.

कोरोना संकटाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. बसेस सुरू झाल्या असल्या, तरी अजूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळापुढे दैनंदिन खर्चाची चिंता आहेच. सध्या तालुका पातळीवरच्या बससे सुरू असल्या, तरी गाव खेड्यापर्यंत अजूनही बसेस सुरू झालेल्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातही बसेसचे वेळापत्रक नक्की नसल्याने, प्रवाशांच्या गोंधळात अधिकच भर पडली आहे. सध्या केवळ ३० टक्के इतक्याच बसेस धावत असून, निम्म्यापेक्षा अधिक बसेस आगारात उभ्या आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेसचे नियोजन करावे लागत आहे.

--इन्फो---

खेडेगावात जाण्यासाठी पिकअपचा आधार

तालुक्याच्या गावांपर्यंत बसेस सुरू असल्या, तरी तालुक्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना पिकअपचा आधार घ्यावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे प्रवासी खासगी वाहनांच्या प्रवासी भाड्यात वाढ झालेली असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

---कोट--

खेडेगावावरच अन्याय का?

पूर्वी गावातल्या रस्त्यावर दिसणारी लालपरी आता दिसेनासी झाली आहे. देवरगाव माझ गाव असून, या गावापर्यंत येण्यास आम्हाला पिकअपचा वापर करावा लागतो. जिपमधील नेहमीचा प्रवास परवडत नसला, तरी आता नाईलाज झाला आहे. बस कधी सुरू होणार, याची कुणी माहितीही देत नाही.

- शंकर जगदाळे, प्रवासी

तालुक्यापर्यंत एसटी बस असली, तरी आम्हाला फार काही उपयोग होत नाही. खासगी वाहनातूनच प्रवास सध्या करावा लागत आहे. त्यातही कधी जीप मिळेलच असे नाही. अनेकदा पायी प्रवास करावा लागतो. बस नसल्यामुळे कोर्टकचेरीची कामेही बंद झाली आहेत.

- रामदास शेवाळे, प्रवासी

----इन्फो---

बस सुरू करण्याबाबतचे कोणतेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. सध्या काही शेड्युल्ड सुरू आहेत. ग्रामीण भागासाठी बसेस सुरू करण्याच्या नियोजनाची चर्चा झालेली आहे. मात्र, अद्याप कोणतेही शेड्युल्ड आलेले नसल्याचे, तसेच शासनाच्या आदेशावर सर्वकाही अवलंबून असल्याचे उत्तर महामंडळाचे अधिकारी देत आहेत. बसेस का कमी आहेत, याचीही माहिती त्यांच्याकडे नाही.

---इन्फो---

हजार किलोमीटरचा प्रवास काय कामाचा

१) सध्या दररोज सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बसेस करीत आहेत. मात्र, यामध्ये ७० टक्के लांब पल्ल्याच्या बसेस असून, तालुका पातळीवर जाणाऱ्या बसेसचे प्रमाण अवघे ३० टक्के इतकेच आहे.

२) प्रवासी संख्या अजूनही कमीच आहे. त्यामुळे महामंडळाला मिळणारे उत्पन्नही पुरेसे नाही. प्रवासी मिळत नसल्याचाही फटका बसला आहे.

३) धुळे, पुणे मार्गावरील प्रवासी संख्या अधिक असल्याने, या मार्गावर बसेस अधिक धावत आहेत. धार्मिक स्थळांवरील बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.