शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

नगरपंचायत : पंचायत बरी म्हणण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया

By admin | Updated: July 20, 2016 01:20 IST

प्रशासनाच्या लालफितीत नागरी सुविधांना ब्रेक

दिंडोरी : नगरपंचायतीची पहिली निवडणूक होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असला तरी येथे कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी न मिळाल्याने विकासकामे तर सोडाच साधी दुरु स्तीचीही कामे होत नसल्याने पदाधिकारी प्रभारी प्रशासनाच्या लालफिती कारभारापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. प्रभारी मुख्याधिकारी व पदाधिकारी यांच्यात दुरावा निर्माण होत असून त्याचा परिपाक मुख्याधिकारी यांच्या कार्यमुक्तीच्या ठरावापर्यंत गेला आहे.जोपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अभियंता दिले जात नाही तोपर्यंत नगरविकास ठप्प च राहण्याची चिन्ह आहे़ नागरिकांना विविध समस्यांना तर पदाधिकारी नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.नगरपंचायत पेक्षा ग्रामपंचायत बरी होती म्हणण्याची वेळ आली आहे. शासनाने कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी देण्याची गरज आहे.दिंडोरी नगरपंचायत होण्यास तांत्रिक विलंब झाल्याने आठ महिने प्रशासकीय कारकीर्द तर आता निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी कारभार सुरळीत झालेला नाही़ शासनाने ग्रामपंचायतींचे नगरपंचायती मध्ये रूपांतर केले परंतु त्यासाठी अधिकारी वर्ग व कामकाजाची रूपरेषा न ठरवल्याने कामकाज लाल फितीत अडकले आहे.प्रभारी मुख्याधिकारी व प्रभारी अभियंता यांची नेमणूक केली असती तरी ते दोन दिवस येत असून त्यांना कामकाज करण्यात मर्यादा येत आहे. अधिकारी येऊ न शकल्यास अनेक वेळा विविध दाखले मिळण्यास विलंब होत जनतेची गैरसोय होत आहे.सुरवातीला नागरिक समस्या घेऊन आले की कारभार नवीन आहे थांबा म्हणून त्यांची बोळवण होत होती सहा महिने उलटूनही देखभाल दुरुस्तीचे साहित्य खरेदी झाले नसल्याने नगरसेवकांना पदरमोड करत पाईपलाईन स्ट्रीट लाईट दुरु स्ती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही त्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. आरोग्य विभागाचीही परिस्थिती वेगळी नसून साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. मासिक सभा फार्स ठरत आहे. कामकाजात गती येत नसल्याने पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात दुरावा वाढत आहे. त्यातूनच सत्ताधारी गटाने सभेत त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव करत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे़ तर विरोधी नागरी आघाडीने मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करत चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका घेत प्रभारी मुख्याधिकारी यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. शासनाने पदांना मान्यता देत त्याच्या भरतीची प्रक्रि या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे सूतोवाच केल्याने कायमस्वरूपी अधिकारी मिळत कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)