शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

नगरपंचायत : पंचायत बरी म्हणण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया

By admin | Updated: July 20, 2016 01:20 IST

प्रशासनाच्या लालफितीत नागरी सुविधांना ब्रेक

दिंडोरी : नगरपंचायतीची पहिली निवडणूक होऊन सहा महिन्यांचा काळ उलटला असला तरी येथे कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी न मिळाल्याने विकासकामे तर सोडाच साधी दुरु स्तीचीही कामे होत नसल्याने पदाधिकारी प्रभारी प्रशासनाच्या लालफिती कारभारापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. प्रभारी मुख्याधिकारी व पदाधिकारी यांच्यात दुरावा निर्माण होत असून त्याचा परिपाक मुख्याधिकारी यांच्या कार्यमुक्तीच्या ठरावापर्यंत गेला आहे.जोपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अभियंता दिले जात नाही तोपर्यंत नगरविकास ठप्प च राहण्याची चिन्ह आहे़ नागरिकांना विविध समस्यांना तर पदाधिकारी नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.नगरपंचायत पेक्षा ग्रामपंचायत बरी होती म्हणण्याची वेळ आली आहे. शासनाने कायमस्वरूपी प्रशासकीय अधिकारी देण्याची गरज आहे.दिंडोरी नगरपंचायत होण्यास तांत्रिक विलंब झाल्याने आठ महिने प्रशासकीय कारकीर्द तर आता निवडणूक होऊन सहा महिने उलटले तरी कारभार सुरळीत झालेला नाही़ शासनाने ग्रामपंचायतींचे नगरपंचायती मध्ये रूपांतर केले परंतु त्यासाठी अधिकारी वर्ग व कामकाजाची रूपरेषा न ठरवल्याने कामकाज लाल फितीत अडकले आहे.प्रभारी मुख्याधिकारी व प्रभारी अभियंता यांची नेमणूक केली असती तरी ते दोन दिवस येत असून त्यांना कामकाज करण्यात मर्यादा येत आहे. अधिकारी येऊ न शकल्यास अनेक वेळा विविध दाखले मिळण्यास विलंब होत जनतेची गैरसोय होत आहे.सुरवातीला नागरिक समस्या घेऊन आले की कारभार नवीन आहे थांबा म्हणून त्यांची बोळवण होत होती सहा महिने उलटूनही देखभाल दुरुस्तीचे साहित्य खरेदी झाले नसल्याने नगरसेवकांना पदरमोड करत पाईपलाईन स्ट्रीट लाईट दुरु स्ती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नाही त्यासाठी उपाय योजना आवश्यक आहे. आरोग्य विभागाचीही परिस्थिती वेगळी नसून साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. मासिक सभा फार्स ठरत आहे. कामकाजात गती येत नसल्याने पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यात दुरावा वाढत आहे. त्यातूनच सत्ताधारी गटाने सभेत त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव करत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे़ तर विरोधी नागरी आघाडीने मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करत चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका घेत प्रभारी मुख्याधिकारी यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. शासनाने पदांना मान्यता देत त्याच्या भरतीची प्रक्रि या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे सूतोवाच केल्याने कायमस्वरूपी अधिकारी मिळत कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. (वार्ताहर)