शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नगरपंचायतीत कामकाज ठप्प

By admin | Updated: June 15, 2015 00:13 IST

आंदोलन : मुख्याधिकारी अद्याप रुजू नाही

कळवण : ग्रामपंचायतचे नगरपंचायत होऊनदेखील प्रशासकामार्फत कामकाज सुरू झाले असले, तरी नगरपंचायतीस अजूनपर्यंत पूर्णवेळ मुख्याधिकारी न मिळाल्याने कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. याबाबत सातत्याने मागणी करण्यात येऊनदेखील मुख्याधिकारी न आल्याने छावा क्रांतिवीर सेनेने गांधीगिरी आंदोलन केले. नगरपंचायतच्या खुर्चीस टोपी, हार घातला. राज्य शासनाने कळवण ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपंचायतमध्ये केले आहे. नगरपंचायतच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी प्रशासकपदी तहसीलदार अनिल पुरे यांची नियुक्ती केली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपंचायतच्या कामकाज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अधिकृत कागदपत्रे प्राप्त न झाल्याने कळवण नगरपंचायतचे कामकाज पूर्णत: ठप्प झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विविध दाखले, गटारी दिवाबत्ती, पाण्याची सोय होत नसल्यामुळे ग्रामस्थांना नाहक हाल सहन करावे लागत आहेत; मात्र प्रशासन बसले आहे. नगरपंचायत लागू झाल्याने सर्व कामकाज हे नगरपंचायतच्या नावानेच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कळवण ग्रामपालिकेचे नाव बदलून ते कळवण नगरपंचायत कार्यालय असे करावे तसेच रजिस्टर, सर्व शिक्के, पावत्या व दाखले हे नगरपंचायतच्या नावाने देण्याचे आदेश आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपंचायतचे रजिस्टर, शिक्के व मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे .ज्या नागरिकांना शासकीय कामकाजासाठी रहिवासी दाखला लागतो आहे, परंतु दाखले मिळत नाही, त्याचप्रमाणे नळपट्टी व इतर कर भरणा करण्यास जाणाऱ्या ग्रामस्थाकडून कर भरणाही करून घेतला जात नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. यामुळे ‘नको ती नगरपंचायत, आपली ग्रामपालिकाच बरी’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास आठ दिवसांत छावा पद्धतीने आंदोलन करण्यात येउन नगरपंचायतच्या खुर्चीचे अंत्यसंस्कार करण्यात येऊन कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी राजू पगार, अनिल बधान, सागर पगार, राकेश पगार, बंडू पगार, अशोक शिंदे, नाना काकुळते, प्रमोद शिंदे, समाधान शिंदे, स्वप्नील पगार, चेतन पगार, टिनू पगार आदिंसह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर )