शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:30 IST

गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला नाशिकमध्ये थांबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे.

नाशिक : गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला नाशिकमध्ये थांबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मेळा बसस्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर नूतनीकरण करण्यात येणार असून, या बस पोर्टचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी झाले. यावेळी सुरेश प्रभू यांनी नाशिकच्या उद्योग क्षेत्राला झळाळी देणारी घोषणा केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही घोषणांचा वर्षाव केला. नाशिकमध्ये यापूर्वी रेल्वे नीर आणि अन्य काही प्रकल्पांच्या घोषणा झाल्या होत्या. मात्र राष्टÑीय स्तरावर प्रकल्प पळवापळवीमुळे प्रकल्प नाशिकला होऊ शकला नव्हता. आता मात्र कर्षण कारखान्याचे विस्तारीकरण करून तेथे नवीन प्रकल्प साकारला जाणार आहे. नाशिकचे वातावरण गुंतवणुकीसाठी चांगले आहे. येथे अनेक उद्योग आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये रेल्वेचा नवा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजूर केला असून, आर्थिक तरतुदीची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे महत्त्व राज्यात खूप असून, मुंबईतील नागरिकांना नाशिकचा भाजीपाला मिळत असतो. त्यामुळे आता मुंबईच्या रेल्वेस्थानकावर नाशिकच्या शेतकºयांच्या भाजीपाला विक्रीची व्यवस्था करणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.नाशिकला केवळ कारखानाच नव्हे तर मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेनला नाशिकला थांबा मिळणार आहे. सुरुवातीला हा थांबा देण्याचे ठरले होेते, परंतु नंतर मात्र सर्वेक्षणात नाशिक वगळण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. रविवारी झालेल्याअडीच तासात जेएनपीटीला  पोहचणे शक्यमुंबई-नागपूर हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्या माध्यमातून नाशिकचा औद्योगिक आणि शेतमाल अवघ्या दोन ते अडीच तासात जेएनपीटी येथे पाठविला जाणे शक्य आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा नाशिकलाच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिकला ड्रायपोर्ट स्थापन केले जाणार आहे. त्यातच समृद्धी मार्ग झाला, तर नाशिक जेएनपीटीला (नेहरू पोर्ट ट्रस्ट) जोडले जाणार आहे. त्याचा फायदा नाशिकला होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासात माल पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.