शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:30 IST

गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला नाशिकमध्ये थांबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे.

नाशिक : गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला नाशिकमध्ये थांबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मेळा बसस्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर नूतनीकरण करण्यात येणार असून, या बस पोर्टचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी झाले. यावेळी सुरेश प्रभू यांनी नाशिकच्या उद्योग क्षेत्राला झळाळी देणारी घोषणा केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही घोषणांचा वर्षाव केला. नाशिकमध्ये यापूर्वी रेल्वे नीर आणि अन्य काही प्रकल्पांच्या घोषणा झाल्या होत्या. मात्र राष्टÑीय स्तरावर प्रकल्प पळवापळवीमुळे प्रकल्प नाशिकला होऊ शकला नव्हता. आता मात्र कर्षण कारखान्याचे विस्तारीकरण करून तेथे नवीन प्रकल्प साकारला जाणार आहे. नाशिकचे वातावरण गुंतवणुकीसाठी चांगले आहे. येथे अनेक उद्योग आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये रेल्वेचा नवा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजूर केला असून, आर्थिक तरतुदीची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे महत्त्व राज्यात खूप असून, मुंबईतील नागरिकांना नाशिकचा भाजीपाला मिळत असतो. त्यामुळे आता मुंबईच्या रेल्वेस्थानकावर नाशिकच्या शेतकºयांच्या भाजीपाला विक्रीची व्यवस्था करणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.नाशिकला केवळ कारखानाच नव्हे तर मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेनला नाशिकला थांबा मिळणार आहे. सुरुवातीला हा थांबा देण्याचे ठरले होेते, परंतु नंतर मात्र सर्वेक्षणात नाशिक वगळण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. रविवारी झालेल्याअडीच तासात जेएनपीटीला  पोहचणे शक्यमुंबई-नागपूर हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्या माध्यमातून नाशिकचा औद्योगिक आणि शेतमाल अवघ्या दोन ते अडीच तासात जेएनपीटी येथे पाठविला जाणे शक्य आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा नाशिकलाच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिकला ड्रायपोर्ट स्थापन केले जाणार आहे. त्यातच समृद्धी मार्ग झाला, तर नाशिक जेएनपीटीला (नेहरू पोर्ट ट्रस्ट) जोडले जाणार आहे. त्याचा फायदा नाशिकला होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासात माल पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.