शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नागपंचमीची परंपरा पावतेय लोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:58 IST

नाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा लोप पावत असल्याचे दिसते. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा करण्यात येतो. वाढत्या शहरीकरणामुळे वारूळे नष्ट झाल्याने शहरी भागात काही ठिकाणी केवळ घरच्या घरी नागनरसोबाच्या चित्राची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागात काही प्रमाणात आता केवळ जुन्या पिढीकडूनच हा सण साजरा करण्यात येतो. नव्या पिढीमध्ये या सणाबद्दल फारशी जागृती दिसत नाही.भारतीय संस्कृतीत पशुपक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. शेतीचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो. या सणाबद्दल पुराणकाळापासून अनेक कथा आहेत. आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागाचे नागपंचमीला पूजन करण्याची प्रथा आहेत. परंतु कालौघात सापांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाल्याने नागासह सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्या.  ग्रामीण भागात सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने सर्पमित्रांकडून प्रबोधन करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. कारण साप चावण्याच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घडतात. वेळीच वैद्यकीय उपचार करण्याऐवजी लोक बुवा बाबा व मांत्रिकाकडे जातात. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच कोणताही साप दिसल्यावर तो विषारी साप समजून त्याला ठार मारले जाते. वास्तविक सर्पमित्रमांकडून कोणता साप विषारी आणि कोणता बिनविषारी यासंबंधी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन झाल्यास सापांचा जीव वाचून पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.