शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीची परंपरा पावतेय लोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:58 IST

नाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा लोप पावत असल्याचे दिसते. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा करण्यात येतो. वाढत्या शहरीकरणामुळे वारूळे नष्ट झाल्याने शहरी भागात काही ठिकाणी केवळ घरच्या घरी नागनरसोबाच्या चित्राची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागात काही प्रमाणात आता केवळ जुन्या पिढीकडूनच हा सण साजरा करण्यात येतो. नव्या पिढीमध्ये या सणाबद्दल फारशी जागृती दिसत नाही.भारतीय संस्कृतीत पशुपक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. शेतीचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो. या सणाबद्दल पुराणकाळापासून अनेक कथा आहेत. आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागाचे नागपंचमीला पूजन करण्याची प्रथा आहेत. परंतु कालौघात सापांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाल्याने नागासह सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्या.  ग्रामीण भागात सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने सर्पमित्रांकडून प्रबोधन करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. कारण साप चावण्याच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घडतात. वेळीच वैद्यकीय उपचार करण्याऐवजी लोक बुवा बाबा व मांत्रिकाकडे जातात. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच कोणताही साप दिसल्यावर तो विषारी साप समजून त्याला ठार मारले जाते. वास्तविक सर्पमित्रमांकडून कोणता साप विषारी आणि कोणता बिनविषारी यासंबंधी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन झाल्यास सापांचा जीव वाचून पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.