ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर गाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून जमिनीतून गुढ आवाज येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.ग्रामस्थांनी तहसिलदार तसेच संबंधित मेरी सीडीओचे अधिकाऱ्यांशी दोन दिवसापूर्वीच संपर्क करुन परिस्थितीची कल्पना दिली होती. परंतु अद्याप पर्यंत अजुन भिती निर्माण झाली आहे. मेरी येथे भुंकप मापक यंत्र असुन त्याद्वारे ८० कि.मी. परिसरातील जमिनीतील हालचाली व भुकंपाची माहिती कळते सदर अधिकारी यांचेशी संपर्क सांधला असता ओतूर येथे भुंकप सदृश हादरे बसत असून २ रिष्टर स्केलपर्यंत सौम्य धक्के बसत आहेत. याबाबत सदर अधिकारी ओतूर येथे शुक्रवारी येणार आहेत. दररोज केव्हाही रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत व दिवसा ५ ते ७ पर्यंत गुढ आवाज जमिनीतून ऐकावयास येतो व भांडी पडतांना दिसतात. दिवसेंदिवस तिव्रता वाढत असून एक दिवस महाभयंकर काळा दिवस उगवेल व फार मोठी आपत्ती ओढवेल अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. तरी शासनाने लोकप्रितिनिधींनी याबाबत त्वरीत कार्यवाही करुन ओतूर ग्रामस्थांना दिलासा द्यावा व पुढील संकट टाळावे असे आवाहन सरपंच दादाजी सुर्यवंशी, दादाजी मोरे, प्रा. अशोक देशमुख, रमेश राकळे, प्रकाश सोनजे, किरण मालपुरे व संपुर्ण ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
ओतूर परिसरात गूढ आवाजाने घबराट
By admin | Updated: September 30, 2016 02:43 IST