शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पालिका खूश ना व्यापारी एलबीटीची वर्षपूर्ती : उत्पन्नाअभावी शहर विकास धोक्यात

By admin | Updated: May 21, 2014 00:25 IST

नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा पर्याय स्वीकारला तेही खूश नाहीत आणि महापालिकाही. त्यामुळे हा कर लावून भले तरी कोणाचे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा पर्याय स्वीकारला तेही खूश नाहीत आणि महापालिकाही. त्यामुळे हा कर लावून भले तरी कोणाचे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.देशभरात फक्त महाराष्ट्रातच जकात असल्याने हा कालबा‘ कर आता रद्द करावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून व्यापारी आणि उद्योजक संयुक्त लढा देत होते. त्यातच नाशिकसारख्या अनेक ठिकाणी जकात वसुलीचे ठेके देण्यात आल्याने व्यापारी आणि उद्योजकांना ठेकेदाराच्या दंडुकेशाहीला सामोरे जावे लागले. त्यामुळे जकात रद्दच्या मागणीने अधिकच जोर धरला. अशावेळी राज्य शासनाने सोलापूरसारख्या ठिकाणी विरोध असणारा कर संपूर्ण राज्यभरातील महापालिकांना लागू केला. नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने नाशिक महापालिका हद्दीत २१ मे रोजी एलबीटी लागू झाला. त्यानंतर ठेकेदाराची सद्दी संपली, परंतु महापालिकेचा त्रास वाढला. जकातीएवढे उत्पन्न मिळत नसल्याने पालिकेची अडचण झालीच; परंतु जकातीच्या नियमावलीत अनेक बदल करून त्यातील करपात्र मालाची तपासणी व अन्य कलमे वगळण्यात आल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली. महापालिकेची जकात वसुली रद्द झाली, त्या अगोदरच्या वर्षात महिन्याला साठ कोटी रुपयांची वसुली होत होती. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात महिन्याकाठी ८० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र ५५ ते ५८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात जकातीपोटी साडेआठशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु जकात रद्द झाल्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून ६७० कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले. त्यामुळे पालिकेचा खोळंबा झाला आहे. महापालिकेची दैनंदिन कामे, नेहरू अभियानातील कामे आणि कुंभमेळ्याची कामे सारीच खोळंबली आहेत. जकातीऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिकेला विक्रमी उत्पन्न मिळेल असे दावे उद्योजक आणि व्यापार्‍यांनी केले होते, ते सारेच फोल ठरले आहेत. त्यामुळे महपालिका खूश नाही आणि व्यापार्‍यांचा विरोध कायम आहे. उद्योजकही त्याला साथ देत असल्याने आता हा कर रद्द करण्याची आणि नवीन पर्याय शोधण्याची वेळ राज्य शासनावर आली आहे.