शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिका खूश ना व्यापारी एलबीटीची वर्षपूर्ती : उत्पन्नाअभावी शहर विकास धोक्यात

By admin | Updated: May 21, 2014 00:25 IST

नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा पर्याय स्वीकारला तेही खूश नाहीत आणि महापालिकाही. त्यामुळे हा कर लावून भले तरी कोणाचे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा पर्याय स्वीकारला तेही खूश नाहीत आणि महापालिकाही. त्यामुळे हा कर लावून भले तरी कोणाचे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.देशभरात फक्त महाराष्ट्रातच जकात असल्याने हा कालबा‘ कर आता रद्द करावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून व्यापारी आणि उद्योजक संयुक्त लढा देत होते. त्यातच नाशिकसारख्या अनेक ठिकाणी जकात वसुलीचे ठेके देण्यात आल्याने व्यापारी आणि उद्योजकांना ठेकेदाराच्या दंडुकेशाहीला सामोरे जावे लागले. त्यामुळे जकात रद्दच्या मागणीने अधिकच जोर धरला. अशावेळी राज्य शासनाने सोलापूरसारख्या ठिकाणी विरोध असणारा कर संपूर्ण राज्यभरातील महापालिकांना लागू केला. नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने नाशिक महापालिका हद्दीत २१ मे रोजी एलबीटी लागू झाला. त्यानंतर ठेकेदाराची सद्दी संपली, परंतु महापालिकेचा त्रास वाढला. जकातीएवढे उत्पन्न मिळत नसल्याने पालिकेची अडचण झालीच; परंतु जकातीच्या नियमावलीत अनेक बदल करून त्यातील करपात्र मालाची तपासणी व अन्य कलमे वगळण्यात आल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली. महापालिकेची जकात वसुली रद्द झाली, त्या अगोदरच्या वर्षात महिन्याला साठ कोटी रुपयांची वसुली होत होती. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात महिन्याकाठी ८० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र ५५ ते ५८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात जकातीपोटी साडेआठशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु जकात रद्द झाल्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून ६७० कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले. त्यामुळे पालिकेचा खोळंबा झाला आहे. महापालिकेची दैनंदिन कामे, नेहरू अभियानातील कामे आणि कुंभमेळ्याची कामे सारीच खोळंबली आहेत. जकातीऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिकेला विक्रमी उत्पन्न मिळेल असे दावे उद्योजक आणि व्यापार्‍यांनी केले होते, ते सारेच फोल ठरले आहेत. त्यामुळे महपालिका खूश नाही आणि व्यापार्‍यांचा विरोध कायम आहे. उद्योजकही त्याला साथ देत असल्याने आता हा कर रद्द करण्याची आणि नवीन पर्याय शोधण्याची वेळ राज्य शासनावर आली आहे.