शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST

मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : खासगी मिळकतींचे स्ट्रक्चरल आॅडिट कोणी करायचे?

अतुल शेवाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. खासगी धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कोणी, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे, तर शहरात आठ हजार ६५२ अनधिकृतरीत्या बांधकामे झाली आहेत. संबंधितानी बांधकाम परवानगी न घेता महापालिकेचा महसूल बुडविला आहे.शहरात १५ अतिधोकादायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. 192इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपाकडे आहे. मात्र स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावरून महापालिकेच्या नगररचना, बांधकाम विभागाच्या व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय दिसून येत आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?मुंबई व इतर शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. मालेगाव महापालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. धोकादायक इमारती निष्कासित कराव्यात. धोकादायक इमारती खाली करणे गरजेचे आहे.- कुंदन चव्हाण, अभियंतामहापालिकेची भूमिकामहापालिकेच्या चारही प्रभागांतील धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. भविष्यात पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती खाली करून घेण्यात येतील. तसेच इमारती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. नगररचना व बांधकाम विभागाला, प्रभाग अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.- किशोर बोर्डे, मनपा आयुक्तधोकादायक इमारती ठरतील जीवघेण्यासध्या शहर परिसरात पाऊस सुरू आहे. महापालिकेची धोकादायक इमारतींबाबत उदासीन भूमिका दिसून येत आहे. केवळ धोकादायक खासगी इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोंद घेण्यात आली आहे व इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई केली जात नाही दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येईल का?