शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST

मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : खासगी मिळकतींचे स्ट्रक्चरल आॅडिट कोणी करायचे?

अतुल शेवाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. खासगी धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कोणी, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे, तर शहरात आठ हजार ६५२ अनधिकृतरीत्या बांधकामे झाली आहेत. संबंधितानी बांधकाम परवानगी न घेता महापालिकेचा महसूल बुडविला आहे.शहरात १५ अतिधोकादायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. 192इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपाकडे आहे. मात्र स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावरून महापालिकेच्या नगररचना, बांधकाम विभागाच्या व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय दिसून येत आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?मुंबई व इतर शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. मालेगाव महापालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. धोकादायक इमारती निष्कासित कराव्यात. धोकादायक इमारती खाली करणे गरजेचे आहे.- कुंदन चव्हाण, अभियंतामहापालिकेची भूमिकामहापालिकेच्या चारही प्रभागांतील धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. भविष्यात पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती खाली करून घेण्यात येतील. तसेच इमारती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. नगररचना व बांधकाम विभागाला, प्रभाग अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.- किशोर बोर्डे, मनपा आयुक्तधोकादायक इमारती ठरतील जीवघेण्यासध्या शहर परिसरात पाऊस सुरू आहे. महापालिकेची धोकादायक इमारतींबाबत उदासीन भूमिका दिसून येत आहे. केवळ धोकादायक खासगी इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोंद घेण्यात आली आहे व इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई केली जात नाही दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येईल का?