शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST

मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : खासगी मिळकतींचे स्ट्रक्चरल आॅडिट कोणी करायचे?

अतुल शेवाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. खासगी धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कोणी, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे, तर शहरात आठ हजार ६५२ अनधिकृतरीत्या बांधकामे झाली आहेत. संबंधितानी बांधकाम परवानगी न घेता महापालिकेचा महसूल बुडविला आहे.शहरात १५ अतिधोकादायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. 192इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपाकडे आहे. मात्र स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावरून महापालिकेच्या नगररचना, बांधकाम विभागाच्या व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय दिसून येत आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?मुंबई व इतर शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. मालेगाव महापालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. धोकादायक इमारती निष्कासित कराव्यात. धोकादायक इमारती खाली करणे गरजेचे आहे.- कुंदन चव्हाण, अभियंतामहापालिकेची भूमिकामहापालिकेच्या चारही प्रभागांतील धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. भविष्यात पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती खाली करून घेण्यात येतील. तसेच इमारती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. नगररचना व बांधकाम विभागाला, प्रभाग अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.- किशोर बोर्डे, मनपा आयुक्तधोकादायक इमारती ठरतील जीवघेण्यासध्या शहर परिसरात पाऊस सुरू आहे. महापालिकेची धोकादायक इमारतींबाबत उदासीन भूमिका दिसून येत आहे. केवळ धोकादायक खासगी इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोंद घेण्यात आली आहे व इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई केली जात नाही दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येईल का?