शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

पालिका निवडणुकीवर रक्तरंजित संघर्षाचे सावट

By admin | Updated: January 22, 2017 23:14 IST

भय इथले संपत नाही : अनेक राजकीय पक्षांकडे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे ‘इच्छुक’

नाशिक : यंदाची महापालिका निवडणूक प्रचंड दहशतीच्या सावटाखाली होण्याची दाट शक्यता जेलरोड येथील घटनेमुळे समोर आली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीला रक्तरंजित गालबोट लागले असून, गेल्या काही वर्षांपासून फोफावलेल्या टोळ्यांमुळे गुंडगिरीचा मोठा संघर्ष पालिका निवडणुकीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच इच्छुक उमेदवार म्हणून समोर आलेले चेहरे आणि प्रभागातील प्रतिस्पर्धी मोडून काढण्यासाठी सुरू झालेले धमकीसत्र पाहता आगामी काळ निवडणुकीसाठी संघार्षाचा असेल याबाबत मतदारांमध्ये चिंतेचा सूर उमटत आहे.  गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे यंदाची निवडणूक चिंताजनक ठरण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीचे इच्छुक असून, त्यांना शब्दही देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या ‘स्टाइलने’ निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. काहींनी तर प्रतिस्पर्ध्याला धमकाविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. खून, खंडणी, अपहरण, शासकीय कामात हस्तक्षेप, लूटमार आणि चिथावणी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि तुरुंगवारी करून आलेल्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्यामुळे यातील काही स्वत:साठी तर काही आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक पक्षांनी अशा इच्छुकांना जवळ केल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रभागांमधील चित्र काय असू शकते, याचा अंदाज पोलिसांनी आताच घेतलेला बरा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  जेलरोड येथे शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवाराचा भर चौकात खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे तर नाशिककरांनी आत्ताच धास्ती घेतली आहे. या घटनेनंतर प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या पक्षात सारेच पावन उमेदवार असल्याचा आव आणतीलही, परंतु नाशिककरांना गुन्हगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांविषयी चांगलीच माहिती असून, काही प्रभागात तर गुंडगिरीचा अनुभव नागरिकांना आतापासूनच येत आहे. वरवर पाहता इच्छुकांकडून प्रचार सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रतिस्पर्धी इच्छुकांना धमकावण्याचे आणि त्यांना निवडणूक न लढण्यासाठी गुंडांकडून दमदाटी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रकरण कधी कुठवर जाईल याचीच भीती नागरिक आणि पोलीस प्रशासनालाही लागली आहे.  गुंडांमुळे राजकीय पक्षांचे वाढते प्राबल्य आणि गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आश्रय यामुळे गुन्हेगार आणि राजकीय पक्ष यांच्यातील संबंध लपून राहिलेले नाहीत. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून शहरातील टोळीयुद्ध आणि खुनाच्या घटनांचा आलेख पाहता यंदाची निवडणूक कोणत्याही थराला जाण्याची शक्यता शक्यता आहे.