शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

सार्वजनिक उपक्रमांसाठी महापालिकेला वाव

By admin | Updated: January 11, 2017 00:28 IST

विकास आराखडा : आरक्षणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न

नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित विकास आराखड्यात सार्वजनिक उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेला भरपूर संधी उपलब्ध करून दिली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. विशेष म्हणजे जुन्या आराखड्यातील आरक्षणांची संख्या कमी करून ती ४५० वर आणण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला आरक्षित जागांचे संपादन करण्यासाठी सुनियोजन करणे शक्य होणार आहे.राज्य शासनाने सोमवारी (दि.९) भागश: विकास आराखडा मंजूर करत त्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यात प्रामुख्याने, शासनाने पब्लिक अ‍ॅमॅनिटीज या नावाखाली महापालिकेला विविध नागरी सुविधा व उपक्रमांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या राजकीय पक्षांना विकासाचे अनेक प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. याशिवाय, शासनाने आरक्षणांची संख्याही कमी करण्यावर भर दिला आहे. आराखडाकार प्रकाश भुक्ते यांनीही आराखडा तयार करताना अनावश्यक आरक्षणांची संख्या कमी करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार, भुक्ते यांनी ४८२ आरक्षणे निश्चित केली होती. जुन्या आराखड्यात ती १९९६ मध्ये १२०० प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु, आरक्षित जागांचे संपादन करताना महापालिकेची झालेली आर्थिक ओढाताण यामुळे अनेक आरक्षणे व्यपगत झाली तर अनेक आरक्षणांची मुदत संपल्याने कलम १२७ च्या नोटिसा जागामालकांनी मनपाला बजावल्या. त्यामुळेच आवश्यक अशा ठिकाणीच आरक्षणांवर भर देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. नवीन विकास आराखड्यात ठराविक उपयोगासाठी आरक्षण न टाकता पब्लिक अ‍ॅमॅनिटीज या शीर्षाखाली समावेश करण्यात आल्याने त्याठिकाणी महापालिकेला त्या- त्या भागाच्या गरजा ओळखून सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.