शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

महापालिका : ‘एसआरए’ योजनेसाठी शासनाला प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेचे ५५,८४३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:50 IST

नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारही घटकांसाठी ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, डीपीआर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देप्रकल्प राबविण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनाडीपीआर तयार करण्याचे काम सुरू

नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारही घटकांसाठी ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, डीपीआर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, परवडणाºया घरकुलांच्या निर्मितीसाठी शासनाकडे एसआरए योजना राबविण्यास मंजुरी मिळण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसाठी घरे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू केली असून, त्याअंतर्गत चार घटकांमध्ये लाभार्थी निश्चित करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. महापालिकेने त्यासाठी झोपडपट्ट्यांचा सर्व्हेही पूर्ण केला आहे, तर अन्य घटकांतून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या प्राप्त अर्जांची छाननी होऊन आता चारही घटक मिळून ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळावा याकरिता डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एसआरए धोरण राबविण्यास मंजुरी मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. सदर धोरण राबविण्यास मंजुरी मिळाल्यास पुष्कळ लाभार्थी या योजनेत समाविष्ट करणे शक्य होणार आहे. याशिवाय, परवडणारी घरे बांधण्यासाठी महापालिका व खासगी बांधकाम व्यावसायिक यांच्या भागीदारीने घरकुल योजना साकारण्याकरिता देकार मागविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.वार्षिक कृती आराखडासद्यस्थितीत सन २००० पर्यंत स्लम घोषित झालेल्या झोपडपट्ट्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. परंतु, राज्य मंत्रिमंडळाने यापुढे सन २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचे घोषित केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने अद्याप त्याबाबत अधिसूचना काढलेली नसल्याने सध्या आहे त्याच प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. त्यासाठी वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येत असून, सरकारची अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर नवीन लाभार्थ्यांनाही या आराखड्यात समाविष्ट करता येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.