शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गणेशवाडी भाजीमंडईसाठी पालिकेचा आटापिटा

By admin | Updated: November 30, 2015 22:49 IST

शिलकी ओट्यांचा लिलाव : किराणा व्यावसायिकांमुळे मंडई होणार सुरू

नाशिक : महापालिकेने गणेशवाडी येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भाजीमंडईमधील ४६८ पैकी १५२ ओट्यांसाठी लिलावप्रक्रिया पूर्ण करून पाच महिने उलटले तरी, अद्याप एकाही विक्रेत्याने मंडईत व्यवसायाला सुरुवात केलेली नाही. भाजीमंडई आजही भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनलेली असताना सदर मंडई सुरू व्हावी आणि पालिकेच्या खजिन्यात उत्पन्न जमा व्हावे, यासाठी महापालिकेचा मात्र आटापिटा सुरू असून, पालिकेने उर्वरित ३१६ ओट्यांसाठी ७ डिसेंबरला लिलावप्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. दरम्यान, किराणा व्यावसायिकांनी सदर जागेत व्यवसाय सुरू करण्यास संमती दर्शविल्याने पालिकेने त्यांना मांडणी उभारण्याकरिता खास भिंतीलगतची जागा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने गोदाघाटावरील भाजीबाजार हटविण्यासाठी व तेथील विक्रेत्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध व्हावी, याकरिता सुमारे ६ कोटी रुपये खर्चून गणेशवाडी येथे भाजीमार्केट उभारले होते. परंतु, गोदाघाटावरील विक्रेत्यांनी मार्केटमध्ये जाण्यास नकार दिल्याने मार्केट अनेक वर्षे धूळखात पडून होते. भाजीबाजार भरत नसल्याने या मार्केटचा ताबा नंतर भिकाऱ्यांनी घेतला. दरम्यान, न्यायालयाने गोदाघाटावरील भाजीमार्केट हटविण्याचे आदेश जून महिन्यात दिल्यानंतर महापालिकेने गणेशवाडी भाजीमार्केटमधील ४६८ ओट्यांसाठी दि. १० जून २०१५ रोजी लिलावप्रक्रिया राबविली होती. या लिलावात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांकडून महापालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये अनामत रक्कम घेतली. त्यानुसार लिलावात १५२ ओट्यांना बोली बोलली जाऊन महापालिकेला महिनाभराचे भाडे २ लाख ४३० रुपये प्राप्त झाले होते, तर अनामत रकमेच्या माध्यमातून ७ लाख ६० हजारांचा महसूल खजिन्यात जमा झाला होता. उर्वरित ३१६ ओट्यांना मागणीच न आल्याने त्यांचा लिलाव तहकूब ठेवण्यात आला होता. लिलावप्रक्रियेत सर्वाधिक बोली मासिक २ हजार रुपये भाड्यासाठी बोलली गेली होती, तर महापालिकेने १३५० रुपयांपासून सुरुवात केली होती. लिलावप्रक्रिया राबविल्यानंतर महापालिकेने सदर मार्केटची दुरुस्ती व साफसफाई करून सुविधाही उपलब्ध करून दिल्या. परंतु, १५२ लिलावधारक विक्रेत्यांनी अद्याप आपल्या व्यवसायाचे बस्तान मार्केटमध्ये बसविलेले नाही. सिंहस्थ कुंभपर्वणी काळानंतर विक्रेत्यांकडून मार्केटचा ताबा घेतला जाईल, अशी अटकळ बांधली गेली; परंतु आता पर्वणी संपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी विक्रेत्यांकडून कसलीही हालचाल दिसून येत नाही. महापालिकेमार्फत संबंधित विक्रेत्यांना मात्र कब्जा पावती केल्यानंतर मासिक भाडे आकारणी सुरू झाली आहे. विक्रेत्यांनी मार्केटकडे पाठ फिरविल्याने पुन्हा एकदा मार्केटचा ताबा भिकाऱ्यांनी घेतला आहे. भाजीमंडईकडे याअगोदरच्या विक्रेत्यांनी पाठ फिरविली असतानाच महापालिकेने उर्वरित ३१६ ओट्यांसाठी पुन्हा एकदा लिलावप्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये किराणा व्यावसायिकांनी स्वत:हून मंडईत व्यवसायासाठी परवानगी मागितल्याने पालिकेने मार्केटच्या उत्तरेकडील भिंतीलगतची खुली जागा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. सुमारे १२ व्यावसायिकांना मांडणी ठेवून व्यवसाय करता येणार आहे. किराणा व्यावसायिकांच्या संमतीमुळे मंडई सुरू होण्याची आशा पालिकेला निर्माण झाल्यानेच उर्वरित ३१६ ओट्यांचा लिलाव काढण्यात आल्याचे समजते.