शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मुंबईच्या ड्यूटीने जिवाला घोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:15 IST

एस.टी चालक-वाहकांचा नकार कोरोनाची भीती : गैरसोय होत असल्याने तब्येतीवर परिणाम नाशिक : मुंबईतील बेस्ट बसेसेवेला मदत करण्यासाठी करण्यात ...

एस.टी चालक-वाहकांचा नकार

कोरोनाची भीती : गैरसोय होत असल्याने तब्येतीवर परिणाम

नाशिक : मुंबईतील बेस्ट बसेसेवेला मदत करण्यासाठी करण्यात आलेल्या करारानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि कर्मचाऱ्यांना मुंबईत जाऊन ड्यूटी करावी लागत आहे. मात्र, तेथील गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाल्याने चालक-वाहकांना मुंबईची ड्यूटी नकोशी वाटत आहे.

कोरोनाच्या संक्रमणामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधून काढले. थोड्या प्रमाणात का होईना महामंडळाचे अर्थचक्र सुरू राहावे यासाठी अनेक उपायोजना करणाऱ्या महामंडळाने बेस्टच्या मदतीच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईत कर्मचाऱ्यांसह बसेस चालविण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे दर महिन्याला नाशिक जिल्ह्यातून बेस्टच्या मदतीला कर्मचारी आणि बसेस पाठविल्या जात आहेत.

या ठिकाणी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय हाॅटेल्स, लॉजमध्ये करण्यात आलेली आहे. जेवणासाठीची देखील वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु मुंबईत सेवा बजाविताना महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांना तेथील जेवणामुळे त्रास सहन करावा लागत आहे, तर राहण्याची सोय देखील सांगितली जाते त्याप्रमाणे होत नसल्याने चालक, वाहक मुंबईत जाण्यास तयार नाहीत. येथील जेवणामुळे अनेकांना त्रास झाल्यामुळे प्रकृतीवर परिणाम झालेला आहे.

राहण्याची गलिच्छ व्यवस्था, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी अनेक कर्मचाऱ्यांनी पुराव्यासह केलेल्या आहेत. मात्र, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचारी मुंबईत जाण्यास तयार नाहीत.

---इन्फो---

गेल्या वर्षी आपल्या जिल्ह्यातून किती जणांना मुंबईला पाठविले.

३८०

चालक

१८०

वाहक

१८०

परत आल्यानंतर किती जण पॉझिटिव्ह निघाले

०७

यावर्षी १३० जणांना पाठविले जाणार आहे.

--इन्फो--

परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास

मुंबईतील डयूटीवरून परत आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. विशेषत: पोटदुखीच्या तक्रारी अनेक चालक, वाहकांनी केल्या. काहींना शारीरिक थकवा जाणवला, तर काहींना पित्ताचा देखील त्रास झाला. ड्यूटीवरून आलेल्या कर्मचाऱ्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असा फतवा महामंडळाने काढला. यामध्ये महामंडळाने कोणताही सहभाग घेतला नाही.

----इन्फो--

चालक, वाहकांच्या प्रतिक्रिया

मुंबईतील ड्यूटी करताना अनेक अडचणी आल्या. एकतर राहण्याची व्यवस्था चांगली नव्हतीच, शिवाय जेवणाची गैरसोय झाली. बेस्टच्या सेवेसाठी महामंडळ आपल्या बसेस आणि कर्मचारी देत असताना बेस्टकडून नियोजन होणे अपेक्षित होते; परंतु एस. टी. कर्मचाऱ्यांकडे लक्षच दिले जात नाही.

- चंद्रकांत देवगाकर, वाहक

सलग दहा दिवस ड्यूटी करावी लागत असल्याने मुंबईत काम करताना मोठा ताण येतो. त्यातही उन्हाळ्यात काम करण्याची सक्ती केली जात असल्याने महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करावा ही अपेक्षा आहे. सेवा कालावधी कमी करणे अपेक्षित आहे.

- आप्पाराव जोपुळे, चालक

--इन्फो--

राज्य पातळीवरच बेस्टबरोबर करार करण्यात आल्याने संपूर्ण राज्यातून प्रत्येक डेपोनिहाय कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली जाते. केवळ चालक, वाहकच नव्हे, तर तांत्रिक कर्मचाऱ्यांना देखील ड्यूटी दिली जाते. डेपो पातळीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.