शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

मुंबईतील दुर्घटना हे शिवसेनेचेच अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:01 IST

भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.मागील वर्षी मिठी नदीच्या सफाईसाठी ६५० कोटी खर्च केले. तरीही मुंबईचे नाले तुंबल्याने या नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबतचा अहवाल विधानसभेत ठेवण्याची मागणी करूनही तो सरकारने ठेवला नसल्याने या आरोपांना पुष्टीच मिळत असल्याचा दावा आमदार विखे-पाटील यांनी केला. ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे. त्यांना शहरात काय चाललेय, याची कल्पनाच नाही. मिठी नदीच्या नालेसफाईच्या ६५० कोटींच्या कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेला मुंबईकरांचे बळी जात असताना या विषयाशी काही घेणे-देणे नाही. त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आहे, तर महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका घेणारे भाजपाचे पहारेकरी झोपल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करायची आणि सुभाष देसार्इंची निवृत्त अधिकाºयामार्फत चौकशी करण्याचा निर्णय भाजपाने शिवसेनेच्या दबावाखाली घेतल्याचा आरोपही यावेळी विखे-पाटील यांनी केला, असा निर्णय घेऊन मुख्यमंत्री स्वपक्षियांवरच अन्याय करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश चिटणीस डॉ. हेमलता पाटील, डॉ. प्रतापराव वाघ, बबलू खैरे आदी उपस्थित होते.