शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

मुंबई, पुण्याला पसंती : दिवसभरात केवळ शंभर विद्यार्थ्यांची नोंद‘

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

एमबीए’च्या समुपदेशनाकडे पाठ

नाशिक : पदवी शिक्षणानंतर प्रथम वर्ष एमबीए, एमएमएस यांसह अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी आज घेण्यात आलेल्या समुपदेशन फेरीकडे (कौन्सिलिंग राउंड) विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे दिवसअखेर केवळ शंभर विद्यार्थ्यांचीच नोंद झाली आहे. राज्यातील सहा केंद्रांपैकी नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी समुपदेशन फेरी घेण्यात आली. मात्र दिवसभरात केवळ १०० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली. त्यातील १६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला, तर १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. मात्र या १३ विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी मुंबई येथील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने नाशिकमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. नाशिकमध्ये एमबीए अभ्यासक्र माची सुविधा पंधरा महाविद्यालयांमध्ये असून, जवळपास दीड हजार जागा आहेत. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येत होते. परंतु एमबीएमधील करिअरच्या संधीचा विचार करता विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याने निम्म्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकसह नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई या सहा केंद्रांमध्ये दहा हजार पाचशे पात्र उमेदवारांसाठी उद्या (दि. ३१) समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे. राज्यात एमबीएकरिता एकूण २० हजार जागा असून, कॅप राउंडअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार ५०० एवढी आहे. (प्रतिनिधी)