शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे’ला कडाडून विरोध

By admin | Updated: June 29, 2016 00:02 IST

हजारो एकर जमीन होणार संपादित : २२ गावांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

 घोटी : प्रस्तावित मुंबई-घोटी- औरंगाबाद-नागपूर या सुपरफास्ट द्रुतगती महामार्गामुळे इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर सुपीक जमिनी संपादित होणार असल्याने या महामार्गाला तालुक्यातील २२ महसुली गावांतील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. हा महामार्ग तालुक्याला भेदून जात असल्याने शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या जमिनीतून शिल्लक राहिलेल्या जमिनीही यात संपादित होणार असल्याने शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे.इगतपुरी तालुक्यातील जमिनी शासनाने महामार्ग, धरणे, लोहमार्ग, लष्कर आदिंसाठी मोठ्या प्रमाणात संपादित केलेल्या असताना आता प्रस्तावित मुंबई-नागपूर या सहापदरी एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी पुन्हा एकदा राज्य शासन शेकडो हेक्टर जमिनी संपादित करणार आहे. याबाबतचे काम शासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या तालुक्यातील सुमारे २२ महसुली गावांच्या शेतकऱ्यांनी मात्र यास जोरदार विरोध दर्शविला आहे. या पूर्वीच आमच्या पूर्वजांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने हजारो हेक्टर जमिनी ताब्यात घेतल्या. उरल्या सुरल्या अल्पजमिनीही संपादित करण्याचा घाट घातला गेल्यामुळे आम्ही कायमचे भूमिहीन होणार असल्याने आम्ही भूसंपादनास विरोध करत आहोत, असे संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सन १९९४-९५मध्ये तत्कालीन राज्य शासनाच्या काळात या प्रस्तावित प्रकल्पाला तालुकावासीयांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रस्तावित प्रकल्पाचा प्रश्न तेव्हा निकाली निघून त्यातून घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्ग तयार करण्याचे शासनाने त्यावेळी ठरविले. संबंधित रस्त्याच्या कडेच्या व आजूबाजूच्या अनेक जागा अद्यापही पडून असून, मग याच रस्त्याचे शासन नूतनीकरण का करत नाही, असा प्रश्न चर्चिला जात आहे.इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांतून सुमारे ९७ किमी अंतराचा हा एक्स्प्रेस वे जात असून, यापैकी एकट्या इगतपुरी तालुक्यातील जवळपास ५० ते ५५ किमीचे अंतर आहे. (वार्ताहर)