शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे’ला कडाडून विरोध

By admin | Updated: June 29, 2016 00:02 IST

हजारो एकर जमीन होणार संपादित : २२ गावांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

 घोटी : प्रस्तावित मुंबई-घोटी- औरंगाबाद-नागपूर या सुपरफास्ट द्रुतगती महामार्गामुळे इगतपुरी तालुक्यातील हजारो हेक्टर सुपीक जमिनी संपादित होणार असल्याने या महामार्गाला तालुक्यातील २२ महसुली गावांतील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. हा महामार्ग तालुक्याला भेदून जात असल्याने शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या जमिनीतून शिल्लक राहिलेल्या जमिनीही यात संपादित होणार असल्याने शेतकरीवर्गात संतापाची लाट पसरली आहे.इगतपुरी तालुक्यातील जमिनी शासनाने महामार्ग, धरणे, लोहमार्ग, लष्कर आदिंसाठी मोठ्या प्रमाणात संपादित केलेल्या असताना आता प्रस्तावित मुंबई-नागपूर या सहापदरी एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी पुन्हा एकदा राज्य शासन शेकडो हेक्टर जमिनी संपादित करणार आहे. याबाबतचे काम शासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या तालुक्यातील सुमारे २२ महसुली गावांच्या शेतकऱ्यांनी मात्र यास जोरदार विरोध दर्शविला आहे. या पूर्वीच आमच्या पूर्वजांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने हजारो हेक्टर जमिनी ताब्यात घेतल्या. उरल्या सुरल्या अल्पजमिनीही संपादित करण्याचा घाट घातला गेल्यामुळे आम्ही कायमचे भूमिहीन होणार असल्याने आम्ही भूसंपादनास विरोध करत आहोत, असे संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सन १९९४-९५मध्ये तत्कालीन राज्य शासनाच्या काळात या प्रस्तावित प्रकल्पाला तालुकावासीयांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे या प्रस्तावित प्रकल्पाचा प्रश्न तेव्हा निकाली निघून त्यातून घोटी-सिन्नर-शिर्डी महामार्ग तयार करण्याचे शासनाने त्यावेळी ठरविले. संबंधित रस्त्याच्या कडेच्या व आजूबाजूच्या अनेक जागा अद्यापही पडून असून, मग याच रस्त्याचे शासन नूतनीकरण का करत नाही, असा प्रश्न चर्चिला जात आहे.इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांतून सुमारे ९७ किमी अंतराचा हा एक्स्प्रेस वे जात असून, यापैकी एकट्या इगतपुरी तालुक्यातील जवळपास ५० ते ५५ किमीचे अंतर आहे. (वार्ताहर)