शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक ‘मॅनेज’ करण्यासाठीच बहुसदस्यीय प्रभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST

नाशिक - जनतेला गृहित धरून राजकीय सोयीने निवडणुका मॅनेज करण्यासाठी प्रभाग पद्धतीत बदल करायचा आणि पैसा ओतून राजकीय तडजोडी ...

नाशिक - जनतेला गृहित धरून राजकीय सोयीने निवडणुका मॅनेज करण्यासाठी प्रभाग पद्धतीत बदल करायचा आणि पैसा ओतून राजकीय तडजोडी करून सत्ता आणायची, हा काय प्रकार सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुकीत चेष्टा सुरू आहे. देशात कुठेही नाही असे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत बदल केवळ महाराष्ट्रातच सुरू असून, देशात हे राज्य वेगळं आहे का, असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अशाप्रकारच्या बेकायदेशीर प्रकाराबद्दल राज्य निवडणूक आयाेगानेच कारवाई करावी तसेच लोकांनीच न्यायालयात जाऊन त्यास विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या १०-१५ वर्षांत एक प्रभाग दोन सदस्यांच प्रभाग, असा प्रकार सुरू आहे. यापूर्वी २०१७ मध्ये निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग होता. राज्य सरकारने तो चुकीचा म्हणून एक सदस्य करण्यासाठी निर्णय घेतला, आता अचानक तीन सदस्यांच प्रभाग घोषित केला. असे का केले, त्याला कोणताही आधार नाही. जर तीन सदस्यांचा एक प्रभाग करायचा होता तर चार सदस्य का रद्द केले, असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी केले. खासदार, आमदार एक इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला एकच उमेदवार निवडून देण्याची पद्धत असताना महापालिका निवडणुकीत तीन उमेदवार का निवडून द्यायचे, असा प्रश्न करीत राज यांनी नागरिकांना तीन नगरसेवकांना कामे सांगताना त्रास होतो, त्याशिवाय त्यांनी तीनवेळा का मतदान करायचे, असा प्रश्न केला. आम्ही या विषयावर बोलू, पण ते राजकीय म्हटले जाईल. मात्र, नागरिकांनी त्यास न्यायालयात जाऊन विरोध केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

इन्फो..

शरियतसारखा कायदा आणा..

राज्यातील महिलांच्या अत्याचारासाठी सध्या असलेले कायदे पुरेसे नाहीत. सध्याची ढिसाळ योजनाच त्याला कारणीभूत आहे, असे मत व्यक्त करताना राज ठाकरे यांनी शरियतसारखा कायदा करायला हवा, याचा पुनरुच्चार केला.

इन्फो...

जाणिवपूर्वक ईडीचा घेाळ...

राज्याचे गृहमंत्री ईडीने चौकशीसाठी बोलवल्यावर हजर राहत नाही, तेच यंत्रणेला मानत नसेल तर काय बेालायचे? मुळात हे सर्व नेते बहुधा एकमेकांना फोन करून एकमेकांना सांगूनच ईडीसारखे प्रकरणे करीत असावेत, असे राज यांनी सांगून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हे खेळ सुरू असल्याचे नमूद केले. मुंबई-आग्रा महामार्गाची चाळण झाली असून, खड्ड्यांमध्ये स्पीडब्रेकरदेखील होते, असे उपरोधिकपणे त्यांनी सांगितले.