शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

By admin | Updated: August 1, 2014 01:10 IST

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

नाशिक : साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्ट्रात उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेला आता एक वर्ष उलटून गेले तरीही अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. इतकेच नव्हे तर पुणे येथील नाट्यगृहाचे काम अपूर्णावस्थेत आहे. येत्या १ आॅगस्टला जयंतीनिमित्त तरी या कामाला मुहूर्त लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे नऊ दशकांपूर्वी तत्कालीन समाजजीवनात अत्यंत कनिष्ठ आणि मागास मानल्या जाणाऱ्या मातंग समाजात जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी कलेचा झेंडा राज्य आणि देशातच नव्हे, तर परदेशात म्हणजे रशियात जाऊन फडकविला. सुमारे सहा डझन (७२) पुस्तके लिहिणाऱ्या अण्णा भाऊंनी डाव्या आघाड्यांच्या कामगार चळवळीत मोठे योगदान दिले. किंबहुना कार्ल मार्क्सच्या विचारांचे ते खंदे पाईक होते. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर उभी नसून कामगारांच्या हातावर आणि शेतकरी, शेतमजूर कष्टकरी यांच्या श्रमावर उभी आहे.’ असे विचार मांडणाऱ्या अण्णा भाऊंची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. केवळ जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याची दखल कोणाला घ्यावीशी वाटली नाही, अशी खंत लोकसाहित्याचे अभ्यासक व शाहिरांनी व्यक्त केली.अनेक वाद्य वाजविण्यात अवगत असलेल्या भाऊंनी लोकनाट्य या लोककलेला समाजप्रबोधनाचे साधन बनविले. त्यांच्या कांदबऱ्यांवर अनेक चित्रपटही निघाले. नुकतीच दि. १८ जुलैला त्यांची पुण्यतिथी होती. या दिवशी नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदि शहरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून फक्त फोटो काढून घेण्याचे कार्यक्रम झाले. मागील वर्षी याच काळात अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील वर्षी दि. १ आॅगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमप्रसंगी केली होती. परंतु त्या घोषणेनंतर पुढे काहीही झाले नाही. इतकेच नव्हे, तर पुणे येथे बिबवेवाडी परिसरात १९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेले अण्णा भाऊ साठे नावाचे नाट्यगृहाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती; परंतु या मागणीची अद्यापही दखल घेतली गेली नाही, अशी खंत समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.