शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

By admin | Updated: August 1, 2014 01:10 IST

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

नाशिक : साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्ट्रात उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेला आता एक वर्ष उलटून गेले तरीही अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. इतकेच नव्हे तर पुणे येथील नाट्यगृहाचे काम अपूर्णावस्थेत आहे. येत्या १ आॅगस्टला जयंतीनिमित्त तरी या कामाला मुहूर्त लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे नऊ दशकांपूर्वी तत्कालीन समाजजीवनात अत्यंत कनिष्ठ आणि मागास मानल्या जाणाऱ्या मातंग समाजात जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी कलेचा झेंडा राज्य आणि देशातच नव्हे, तर परदेशात म्हणजे रशियात जाऊन फडकविला. सुमारे सहा डझन (७२) पुस्तके लिहिणाऱ्या अण्णा भाऊंनी डाव्या आघाड्यांच्या कामगार चळवळीत मोठे योगदान दिले. किंबहुना कार्ल मार्क्सच्या विचारांचे ते खंदे पाईक होते. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर उभी नसून कामगारांच्या हातावर आणि शेतकरी, शेतमजूर कष्टकरी यांच्या श्रमावर उभी आहे.’ असे विचार मांडणाऱ्या अण्णा भाऊंची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. केवळ जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याची दखल कोणाला घ्यावीशी वाटली नाही, अशी खंत लोकसाहित्याचे अभ्यासक व शाहिरांनी व्यक्त केली.अनेक वाद्य वाजविण्यात अवगत असलेल्या भाऊंनी लोकनाट्य या लोककलेला समाजप्रबोधनाचे साधन बनविले. त्यांच्या कांदबऱ्यांवर अनेक चित्रपटही निघाले. नुकतीच दि. १८ जुलैला त्यांची पुण्यतिथी होती. या दिवशी नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदि शहरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून फक्त फोटो काढून घेण्याचे कार्यक्रम झाले. मागील वर्षी याच काळात अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील वर्षी दि. १ आॅगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमप्रसंगी केली होती. परंतु त्या घोषणेनंतर पुढे काहीही झाले नाही. इतकेच नव्हे, तर पुणे येथे बिबवेवाडी परिसरात १९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेले अण्णा भाऊ साठे नावाचे नाट्यगृहाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती; परंतु या मागणीची अद्यापही दखल घेतली गेली नाही, अशी खंत समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.