शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

महावितरणच्या वेळापत्रकाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:05 IST

नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पिकांना पाणी देण्यास अडचण; बदल करण्याची मागणी

नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.दिवसभर शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठ्याची गरज असते. मात्र काही भागात तीन तर काही भागात चार दिवस थ्री फेज पुरवठा केला जातो. या वेळापत्रकात रात्रीच्या थ्री फेजचा सकाळी ( ६.४० ) पर्यंतच्या वेळेवर शेतकरी नाराज आहे. हीच वेळ बदलून किमान सकाळी दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या असलेल्या सकाळच्या वेळेत शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याबरोबरच वाडी-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याचे व जनावरांच्या पाणी साठविण्यासाठी हे वेळापत्रक सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे महावितरणने या वेळेत त्वरित बदल करून शेतकऱ्यांना दिलास देण्याची मागणी नायगावचे माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.--सध्या सर्वत्र विविध पिकांच्या लागवडीची लगबग सुरू आहे. लागवड केलेल्या पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी सर्वच भागात किमान दहा तास थ्री फेज वीजपुरवठा गरजेचा आहे. अशा परिस्थितीत देशवंडी फीडरवर तीनच दिवस थ्री फेज वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही ही शोकांतिका आहे.- दत्ताराम डोमाडे, शेतकरी, देशवंडीकृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना कधी पाणीटंचाई कधी अवकाळी तर कधी बदलत्या हवामानाबरोबर विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो आहे. येत्या आठवडाभरात सुधारित वेळापत्रक जाहीर केले नाही तर नायगाव खोऱ्यातील शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.- भाऊसाहेब लोहकरे. माजी सरपंच. नायगाव

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज