शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

महावितरणच्या वेळापत्रकाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:05 IST

नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पिकांना पाणी देण्यास अडचण; बदल करण्याची मागणी

नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.दिवसभर शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठ्याची गरज असते. मात्र काही भागात तीन तर काही भागात चार दिवस थ्री फेज पुरवठा केला जातो. या वेळापत्रकात रात्रीच्या थ्री फेजचा सकाळी ( ६.४० ) पर्यंतच्या वेळेवर शेतकरी नाराज आहे. हीच वेळ बदलून किमान सकाळी दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या असलेल्या सकाळच्या वेळेत शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याबरोबरच वाडी-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याचे व जनावरांच्या पाणी साठविण्यासाठी हे वेळापत्रक सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे महावितरणने या वेळेत त्वरित बदल करून शेतकऱ्यांना दिलास देण्याची मागणी नायगावचे माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.--सध्या सर्वत्र विविध पिकांच्या लागवडीची लगबग सुरू आहे. लागवड केलेल्या पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी सर्वच भागात किमान दहा तास थ्री फेज वीजपुरवठा गरजेचा आहे. अशा परिस्थितीत देशवंडी फीडरवर तीनच दिवस थ्री फेज वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही ही शोकांतिका आहे.- दत्ताराम डोमाडे, शेतकरी, देशवंडीकृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना कधी पाणीटंचाई कधी अवकाळी तर कधी बदलत्या हवामानाबरोबर विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो आहे. येत्या आठवडाभरात सुधारित वेळापत्रक जाहीर केले नाही तर नायगाव खोऱ्यातील शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.- भाऊसाहेब लोहकरे. माजी सरपंच. नायगाव

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज