शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

महावितरणच्या वेळापत्रकाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:05 IST

नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

ठळक मुद्देनायगाव खोरे : पिकांना पाणी देण्यास अडचण; बदल करण्याची मागणी

नायगाव : महावितरण कंपनीच्या बदललेल्या थ्री फेज वेळापत्रकावर नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सकाळच्या सत्रातील वेळापत्रक बदलण्याची मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे.दिवसभर शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठ्याची गरज असते. मात्र काही भागात तीन तर काही भागात चार दिवस थ्री फेज पुरवठा केला जातो. या वेळापत्रकात रात्रीच्या थ्री फेजचा सकाळी ( ६.४० ) पर्यंतच्या वेळेवर शेतकरी नाराज आहे. हीच वेळ बदलून किमान सकाळी दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा वाढविण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या असलेल्या सकाळच्या वेळेत शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याबरोबरच वाडी-वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याचे व जनावरांच्या पाणी साठविण्यासाठी हे वेळापत्रक सध्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे महावितरणने या वेळेत त्वरित बदल करून शेतकऱ्यांना दिलास देण्याची मागणी नायगावचे माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.--सध्या सर्वत्र विविध पिकांच्या लागवडीची लगबग सुरू आहे. लागवड केलेल्या पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी सर्वच भागात किमान दहा तास थ्री फेज वीजपुरवठा गरजेचा आहे. अशा परिस्थितीत देशवंडी फीडरवर तीनच दिवस थ्री फेज वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना विहिरीत पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही ही शोकांतिका आहे.- दत्ताराम डोमाडे, शेतकरी, देशवंडीकृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना कधी पाणीटंचाई कधी अवकाळी तर कधी बदलत्या हवामानाबरोबर विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो आहे. येत्या आठवडाभरात सुधारित वेळापत्रक जाहीर केले नाही तर नायगाव खोऱ्यातील शेतकरी आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे.- भाऊसाहेब लोहकरे. माजी सरपंच. नायगाव

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज