शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ‘पडला उजेड’पहिल्याच पावसात

By admin | Updated: May 10, 2016 00:34 IST

दाणादाण : तब्बल दहा तास वीज यंत्रणा विस्कळीत

नाशिक : मान्सूनपूर्व पावसामुळे वीज वितरण कंपनीचे पितळ उघडे पडले असून खिळखिळीत झालेली वीज वितरण प्रणाली आणि अभियंत्यांचा निष्काळजीपणा या पावसामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसामुळे तब्बल दहा तास शहरातील वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती. सोमवारपर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात होताच शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित झाला होता. नेमके काय झाले आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होणार, याची माहिती देणारी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जनसंपर्क अधिकारी नसल्यामुळे मुख्य अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंतादेखील हतबलता दर्शवित असून ग्राहकांचे समाधान करणारी माहिती अथवा उत्तरे देतानाही अधिकारी चाचपडत असल्याने या अभियंत्यांकडे नेमके अधिकार तरी काय आहेत, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तब्बल ४० पेक्षा अधिक फिडर बंद पडले होते. तर पाच सबस्टेशनदेखील बंद पडल्याने शहराचा मोठा भाग अंधारात होता. मात्र काल याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. विस्कळीत वीज यंत्रणेचा सर्वाधिक फटका सातपूर सबस्टेशनवरील ग्राहकांना बसला. (प्रतिनिधी)