शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

अकरा महिन्यात तिसऱ्यांदा एमपीएससीची परीक्षा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:25 IST

इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही १)महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती असतांना महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत, राजकीय घराण्यात ...

इतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही

१)महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती असतांना महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत, राजकीय घराण्यात मोठी लग्न समारंभ पार पडत आहेत तसेच केंद्र सरकारच्या सर्व परीक्षांही होत आहेत . महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशनही होते. मग एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवरच अन्याक का असा प्रश्न परीक्षार्थींकडून उपस्थित केला जात आहे.

२)महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, विद्यार्थ्यांना पीपीई कीटचे संरक्षण देऊन तसेच विद्यार्थ्यांची वयोमर्यादा अटीत ३ वर्षांची वाढ करुन देण्यात यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

३)एमपीएसतीची परीक्षा यापूर्वी फेब्रुवारी २०१९मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षात परीक्षा घेण्यात आलेली नाही. याच कालावधीत युपीएसची परीक्षा प्रक्रीया होऊन दुसरी पूर्व परीक्षाही झाली. जेईई, नीट, वेगवेगळ्या सीईटी परीक्षाही झाल्या. मग एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही असा सवाल परीक्षार्थी उपस्थित करीत आहेत.

-

परीक्षा रद्द होण्याची तिसरी वेळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी (दि.११) परिपत्रक काढून राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याचे कारण सोमवारी (दि.१४) वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ गटातील अधिकारी पदासाठी होणारी एमपीएससी परीक्षा आत्तापर्यंत अकरा महिन्यांत तीन वेळा रद्द झाली आहे, सुरुवातीला कोरोनाविषयी भितीचे वातावरण असल्याने ५ एप्रिलला होणारी परीक्षा रद्द झाल्यानंतर ११ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र आरक्षणाच्या प्रश्नामुळे ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. ती आता १४ मार्चला होणार होती. मात्र कोरोनाचे कारण देत आयोगाने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली असून आता २१ मार्चला ही परीक्षा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

--

परीक्षेसाठी हॉलतिकटीही दिले गेले होते.

परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना आणि परीक्षेसाठी हॉल तिटीकटही मिळालेले असताना ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वीही अशाचप्रकारे परीक्षा एक दोन दिवसावर असताना परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अशा प्रकारांममुळे उमेदवारांंमध्ये संभ्रस्वस्था निर्माण होऊन त्यांचा वारंवार हिरमोड होत आहे.

कोट-१

परीक्षा होणे अवश्यक होते, युपीएससीने कोरोनाचा प्रभाव असताना परीक्षा घेतल्या .मग एमपीएससीलाच काय अडचण आहे असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे, परीक्षेची संपूर्ण तयारी केली होती. मात्र अशा प्रकारे परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने परीक्षार्थी तणावात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

-वैशाली सूर्यवंशी, परीक्षार्थी

कोट-२

परीक्षा पुढे ढकलल्याने तणावाची परीस्थीती निर्माण झाली आहे. कोरोना काळात अन्य परीक्षा होत असतील, तर एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही? हा अनाकलनीय प्रश्न झाला आहे. अशा प्रकारे वारंवार परीक्षा पुढे ढकलून शासन रोजगारनिर्मितीचे धोरण कसे साध्य करणार याचा विचार होणे आवश्यक आहे. आता आपण कोविडसोबत जगायला शिकलो आहोत त्यामुळे नियोजित वेळेत परीक्षा व्हायला हवी होती.

- धनंजय राऊत, परीक्षार्थी

कोट- ३

युपीएससी देशभरात परीक्षा घेत असतानाही दोन परीक्षा झाल्या, त्याचप्रमाणे जेईई, नीट सारख्याही परीक्षा कोविडमध्येच झाल्या, असे असताना केवळ एमपीएससीच वारंवार पूढे का ढकलली जात आहे. जवळपास दोन वर्षांपासून एमपीएससीची परीक्षा झालेली नाही. परीक्षा व पदस्थापनेचा कालावधी जवळपास दोन वर्षाचा आहे. असा विचार केल्यास परीक्षार्थी उमेदवारांचे चार वर्षाचे नूकसान झाले आहे.

- अश्विनी चिताळकर, परीक्षार्थी