शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे खासदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

गेल्या आठ दिवसांपासून कांदा बाजारभाव सातत्याने घसरत आहेत. शेतकरी वर्गाने ६ महिन्यांपासून साठवलेला कांदा खराब तर होतच होता, शिवाय ...

गेल्या आठ दिवसांपासून कांदा बाजारभाव सातत्याने घसरत आहेत. शेतकरी वर्गाने ६ महिन्यांपासून साठवलेला कांदा खराब तर होतच होता, शिवाय शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे मागच्या महिन्यात कांदा दर खाली आले. आता नवीन पोळ कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. देशात मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत बंदी हटवून कांदा निर्यात सुरू केली नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. कांदा पिकवत असताना शेतकऱ्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कांदा उत्पादन आता खर्चीक झाले आहे. बियाणे, रासायनिक खते, मजुरीचे दर, शेती तयार करायला लागणारे इंधनाचे दर शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. केंद्राच्या निर्यातीबाबत धरसोड धोरणाचा तो बळी ठरत आहे. असे असताना शासनाने कांद्याला जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी किरण मोरे, दिगंबर धोंडगे, पंकज बोरसे, हर्षल अहिरे, राजेंद्र सोनवणे, मिलिंदकुमार जाधव, संदीप बागुल आदी उपस्थित होते.

इन्फो

खासदार सुभाष भामरे यांनी, शेतकरी वर्गाची मागणी योग्य आहे व येत्या सोमवारी दिल्लीला जाऊन पीयूष गोयल व इतर मंत्रिवर्गाची भेट घेऊन ताबडतोब निर्यात खुली करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शेतकरी वर्गाला दिले.

फोटो- ०५ नामपूर ओनियन

खासदार सुभाष भामरे यांना कांदाप्रश्नी निवेदन देताना राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अभिमन पगार, किरण मोरे, पंकज बोरसे, दिगंबर धोंडगे आदी.

===Photopath===

051220\05nsk_7_05122020_13.jpg

===Caption===

खासदार सुभाष भामरे यांना कांदाप्रश्नी निवेदन देताना राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अभिमन पगार, किरण मोरे, पंकज बोरसे, दिगंबर धोंडगे आदी.