शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

कंधाणे गटातून उमेदवारीसाठी हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:25 IST

बागलाण तालुक्याच्या बळीराजाची आर्थिकवाहिनी समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने ऐन लग्नसराईच्या धामधुमीत तालूुयातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. एका बाजूला उष्णतेचा वाढता प्रकोप व आप्तेष्टांच्या लग्नसराईची धावपळ यातच निवडणूकीचे रणशिंग फुंकले गेल्याने ईच्छूक उमेदवारांन बरोबरच उत्साही कार्यकर्तांची धावपळ वाढली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे .

कंधाणे : बागलाण तालुक्याच्या बळीराजाची आर्थिकवाहिनी समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजल्याने ऐन लग्नसराईच्या धामधुमीत तालूुयातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. एका बाजूला उष्णतेचा वाढता प्रकोप व आप्तेष्टांच्या लग्नसराईची धावपळ यातच निवडणूकीचे रणशिंग फुंकले गेल्याने ईच्छूक उमेदवारांन बरोबरच उत्साही कार्यकर्तांची धावपळ वाढली असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे . अभी नही तो कभी नहीं म्हणत सत्तेच्या सारीपाटातील वजीरांनी ही निवडनुक प्रतिष्ठेची केल्याने जुन्या राजकीय नेत्यांन बरोबर तरु णाईनेही आपले नशीब आजमावण्यासाठी शड्डु ठोकले आहे.  कंधाणे गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असल्याने येथे उमेदवारीसाठी ईच्छूकांची संख्या जास्त असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यंदा नवीन नियमानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक (१० गुंठे क्षेत्र धारक) शेतकºयाला मतदानाचा अधिकार मिळाला असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.  पुरूष मतदारांबरोबरच महिला मतदारांची संख्याही लक्षणीय असल्याने महिला वर्ग मतदानाचा कौल बदलू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय आखाड्यात होत आहे. ही निवडनुक युती व आघाडीतच होईल असे आखाडे राजकीय नेत्यांनकडून वर्तवीले जात असल्याने त्या दुष्टी कोनातून ईच्छूकांनी उमेदवारीसाठी संबधितांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. मागील संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील जाणकार राजकीय नेत्यानी सुकाणू समिती स्थापना करून निवडणुक बिनविरोध पारपाडली होती. तेव्हा तालुक्यातील काही राजकीय नेत्यांचा राजकीय हिरमोड झाला होता. त्यामुळे यंदाची निवडणुक चुरशीची होणार हे निश्चित. यंदाची निवडणुक आजी माजी आमदार व केंद्रीय मंत्री यांच्या भोवतीच फिरणारा असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे . आमदार संजय चव्हाण यांचे तालुक्यातील असलेले जिव्हाळयाचे संबंध यामुळे त्यांच्या कडून उमेदवारी करण्यास ईच्छूकांची संख्या जास्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनीही अल्पावधीतच या भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता वर्ग जमा केला असल्याने उमेदवारी साठी ईच्छूकांची भाऊ गर्दी त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात राहणार आहे . खरे राजकीय चित्र माघारी नंतरच सष्ट होणार असले तरी राजकीय हालचाली गतीमान झाल्या असुन मतदार बळीराजांना ईच्छूकांन कडून येता जाता राम राम न चुकता घातला जात आहे. लग्नसमारंभात न चुकता हजेरी लावली जात आहे. परिसरातील राजकीय धुमाळीत कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक