शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

त्र्यंबकेश्वर मेटघर किल्याचा कायापालट करण्याच्या हालचाली सुरु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 14:45 IST

त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिवारी या परिसराचा पाहणी दौरा करण्यात आला.यावेळी ब्रम्हगिरी परिसरातील जवळपास सहा वाड्या-पाडे मिळुन स्थापन करण्यात आलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन आमदार खासकरांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पर्यटन विकास विभागांतर्गत असलेला निधी सुमारे पाच कोटी रु पये उपलब्ध झाले असून हा निधी वितरीत करण्यापुर्वी अत्यावश्यक कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.या प्रसंगी अटल आखाड्याचे महंत उदयगिरी महाराज यांच्या समवेत विस्तृत चर्चा करण्यात आली. सध्या म्हाळसादेवी मंदिर जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. येथे सभामंडप व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यावेळेस गंगाद्वारच्या नुतनीकरणाविषयी आर्किटेक्चुअल प्रेझेटेशन करण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, नगरसेवक सागर उजे, संपत बदादे, काळु भांगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र .२ चे उपविभागीय अभियंता पांडुरंग सोनवणे, वास्तु विशारद ऋतुुजा लोहगावकर, बांधकाम व्यावसायिक प्रविण शिरसाट आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे पावसाळ्यात अतिवृष्टीने दरड कोसळणे, मोठमोठे दगड निसटणे तसेच उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटणे तथा नष्ट होणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे मेटघेरा किल्यावरील रहिवासी स्थलांतर करतात. कारण शेतीवर, पायऱ्यांवर सिझनेबल व्यवसाय करु न शेतीला पुरक व्यवसाय केल्याने त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत असतो. यासाठी वरच पाण्याची सुविधा मेटघरचा पर्यटन विकास खात्यामार्कत कायापालट झाल्यास स्थलांतरही होणार नाही. व्यवसाय शेतीही करता येवू शकेल.(फोटो १३ त्र्यंबक,०१)पाहणी करतांना आमदार हिरामण खोसकर. सोबत वनविभागाचे अधिकारी अटल पंचायती अखाड्याचे महंत उदयगिरी महाराज मेटघेरा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक आदी.

 

टॅग्स :Governmentसरकारtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर